लवकरच राज्यात पहिल्या वर्गापासून शाळा सुरू होणार?

127

कोरोनामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन माध्यमातून शाळा भरत आहेत. कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या, लहान मुलांची प्रतिकारशक्ती या सर्व गोष्टींचा विचार करत, सरकार लवकरच पहिली इयत्तेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या १० ते १५ दिवसात कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शाळांबाबत निर्णय घेण्यात येईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व शाळा सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.

६० टक्के अँटिबॉडिज

तज्ज्ञ डॉक्टरांच्या अहवालानुसार लहान मुलांमध्ये उत्तम प्रतिकारशक्ती असून, लहान मुलांच्या शरीरात कोरोनाविरोधात लढणाऱ्या ६० टक्के अँटिबॉडिज आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी लवकरात लवकर शाळा सुरू करावी असा, सल्ला दिला आहे. गेली दोन वर्षे शाळा बंद असल्यामुळे मुलांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पालक व तज्ज्ञ मंडळी शाळा सुरू करण्यासाठी आग्रही आहे.

( हेही वाचा : मशिदींवर भोंगे कोणत्या कायद्याखाली? उच्च न्यायालयाचा थेट सवाल )

मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम

मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री रुग्णालयात उपचार घेत असून त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढे काही दिवसात शाळांबाबत चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे. शारिरीक आणि मानसिक नुकसान तर होतच आहे. त्याशिवाय सामाजिक जडणघडणही होत नाही. यावर उपाय म्हणजे, लवकरात लवकर शाळा सुरु करायला हव्यात, असे राष्ट्रीय निओनॅटोलॉजी फोरमचे राष्ट्रीय सरचिटणीस दिनेश तोमर यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.