दिंडीत भरधाव पिकअप घुसला; २० पेक्षा जास्त वारकरी जखमी, दोघांचा मृत्यू

96

कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे.  मावळ तालुक्यात हा अपघात आज, शुक्रवारी सकाळी झाला असून वारकरी दिंडीत भरधाव पिकअप घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर, 20 पेक्षा अधिक वारकरी जखमी झाली आहेत. जखमी झालेल्या वारकऱ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.

पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

मिळालेल्या माहितीनुसार, खालापूरच्या उंबरगाव येथून ही दिंडी निघाली होती. माऊली चॅरिटेबल ट्रस्टची ही दिंडी आळंदीकडे पायी निघाली होती. कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी या दिंडीने प्रस्थान केले. हा अपघात जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे साडेपाच वाजता वडगाव मावळ जवळील साते गावच्या हद्दीत झाला आहे. पहाटे साडेपाच वाजता वडगाव मावळ जवळील साते गावच्या हद्दीत असताना एक भरधाव पिकअप घुसला.

(हेही वाचा – परळीतील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवण्याची धमकी!)

पिकअप चालकाला ताब्यात 

ही घटना घडल्यानंतर वडगाव मावळ पोलिसांना घटनास्थळी दाखल करण्यात आले. त्यांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले आणि जखमी वारकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.