तारीख पे तारीख! ४१ वर्षांपासून सुरू होता खटला, अखेर केस बंद करण्याची पीडितेची मागणी

109

देशात कित्येक बलात्कार झाल्याचे घटना तुम्हाला माहित असेल. बलात्काराच्या घटनेनंतर अनेक खटले न्यायालयात दाखल केले जातात तर जलद गतीने त्यावर सुनावणी होऊन आरोपीला त्वरीत शिक्षा देखील सुनावणी जाते. मात्र असा एक खटला आहे, जो 41 वर्ष उलटून गेल्यानंतरही सुरू होता, अखेर पीडितेने दाखल केलेली केस बंद करण्यात यावी अशी मागणी न्यायालयात केली आहे.

काय म्हणाली पीडिता

गेल्या 41 वर्षांपासून बलात्काराचा खटला अहमदाबाद सेशन कोर्टामध्ये सुरू आहे. मात्र अद्यापही या प्रकरणाचा निकला लागलेला नाही. शेवटी कंटाळून या प्रकरणातील पीडितेनेच ही केस आता बंद करण्यात यावी अशी मागणी न्यायालयात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता या पीडितेचे वय 55 वर्ष आहे. न्यायाधीश डी.एम. व्यास यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. दरम्यान, न्यायालयात महिलेने असे सांगितले की, ‘आता माझे वय 55 वर्ष आहे. बालात्काराच्या घटनेला आता 41 वर्ष उलटून गेले आहेत. आणखी काही काळ या सर्व कादेशीर प्रक्रियेचा भाग बणण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे हा खटला बंद करण्यात यावा.’

(हेही वाचा – टीईटी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप, तुकाराम सुपेंना अटक)

असं आहे प्रकरण

मुंबईतील एका टॅक्सीचालकावर संबंधित पीडितेने आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. हा घटना 30 जून 1980 रोजी घडली होती. त्यावेळी या पीडितेचे वय 16 वर्षे होते. ही घटना घडल्यानंतर तब्बल 41 वर्ष उलटून गेले. तरी देखील तिला न्याय मिळालेला नाही. अखेर 55 वर्षीय महिलेने आता ही केस बंद करण्यात यावी अशी, मागणी न्यायालयाकडे केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.