तीन दिवसांत चंद्रपूरात दुस-यांदा वाघाच्या हल्ल्यात माणसाचा बळी

144

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत दुस-यांदा वाघाच्या हल्ल्यात माणसाचा बळी गेल्याची घटना घडली. गुरुवारी चंद्रपूरातील सावली विभागात वाघाच्या हल्ल्यात एका माणसाचा मृत्यू झाला. भगनदास झडकर (३५) असे मृताचे नाव आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास भगनदास यांचा मृतदेह आढळला. यंदाच्या वर्षात चंद्रपूरात आतापर्यंत १९ वेळा वाघांनी माणसांवर हल्ले केले आहेत.

( हेही वाचा : मुंबईकरांना ३५ लाख राष्ट्रध्वजांचे वाटप, आणखी ५ लाख ध्वजांची खरेदी)

याबाबत माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत वनाधिका-यांकडून घटनेबाबत चौकशी सुरु होती, अशी माहिती चंद्रपूर वनविभाग प्रशासनाकडून दिली गेली. शेतातील कामे संपवून घरी परत येत असताना झडकर यांच्यावर वाघाचा हल्ला झाला. त्यांच्यासोबत दोन शेतमजूरही होते. तिघांनीही वाटेत बैलांना चरण्यासाठी थांबवले. त्यावेळी वाघ जवळपास असल्याची कुणकुण बैलांना लागली. बैल चवताळल्यानंतर शेतात दबा धरुन बसलेले दोन वाघ बाहेर आले. वाघांना पाहताच झडकर यांच्यासह दोघांनी शेतात धाव घेतली. परंतु झडकर यांना एका वाघाने फरफडत शेताच्या आत नेले. सायंकाळी त्यांचा मृतदेह सापडला. याबाबत शुक्रवारी सकाळी झडकर यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली जाईल, अशी माहिती वनविभागाने दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.