महापालिका जतन करणार स्वातंत्र्याच्या खुणा: ऑगस्ट क्रांती मैदानाचे असे होणार सुशोभीकरण!

88

मुंबईतील स्वातंत्र्याच्या खुणा जतन करण्याचा प्रयत्न आता मुंबई महापालिकेच्या माध्यमातून केला जात आहे. या अंतर्गत ‘डी’ विभागातील आँगस्ट क्रांती मैदान व सभोवतालच्या परिसराच्या पुरातन वैशिष्टांचे जतन करण्याच्या दृष्टीकोनातून आता सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यामुळे या मैदानातील महापालिकेच्या चौक्या हलवल्या जाणार आहेत. तर मैदानाच्या चहू बाजूला असलेल्या संरक्षण भिंती तोडून त्या ऐवजी लोखंडी ग्रील लावत मैदानाला जोडल्या जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या पदपथांचे सुशोभीकरणही केले जाणार आहे.

सुशोभीकरणासाठी किती होणार खर्च?

ऑगस्ट क्रांती मैदानाचे अनन्य साधारण महत्व असून ऑगस्ट क्रांती मैदान हे गावदेवी पुरातन प्रसिमेमध्ये येत असल्याने ऑगस्ट क्रांती मैदान व परिसराचे जतन करणे आवश्यक आहे. या कामांतर्गत मैदानातील सिमेंटचा पाथ वे काढून त्याजागी मातीचा पाथ वे तयार केला जाणार आहे. त्यासाठी पावसाळी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल अशाप्रकारे पर्जन्य जलवाहिन्यांचे काम केले जाणार आहे. या कामासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

महापालिकेच्या चौकी हटवून त्या भागाचे सुशोभीकरण

पुरातन वास्तू विभागाची जबाबदारी असलेल्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि शहर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातन वास्तू विभागाचे प्रमुख अभियंता संजय सावंत व डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या देखरेखीखाली हे काम केले जाणार आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मुंबईतील स्वातंत्र्याच्या खुणा जतन करण्याच्या उद्देशाने या मैदान आणि आसपासच्या परिसराचे सुशोभीकरण केले जात आहे. ज्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असून दोन टप्प्यात याच्या सुशोभीकरणाचे काम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – मनसे सज्ज! औरंगाबाद सभेपूर्वीच पुण्याहून मागवले ५० हून अधिक भोंगे )

हे मैदान बाहेरूनही पाहता यावे म्हणून लोखंडी ग्रील लावल्या जातील, शिवाय आतील महापालिकेच्या चौकी हटवून त्या भागाचे सुशोभीकरण केले जाईल. त्यातील एका भिंतीवर आंदोलनाचे म्युरल उभारले जाईल.तसेच आसपासच्या रस्त्यांचे व त्यावरील पदपंथांचे सुशोभीकरण केले जाईल, जेणेकरून मुंबईकरांसह इथे येणाऱ्या पर्यटकांना या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देता येईल. या माध्यमातून ‘चले जाव’ या महात्मा गांधीजी यांनी पुकारलेल्या लढ्याच्या या जागेचा इतिहास जाणून घेता येईल.

काय आहे इतिहास

८ ऑगस्ट, १९४२ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅक मैदानावर (ऑगस्ट क्रांती मैदान) येथे झालेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात महात्मा गांधीजींनी ब्रिटीश सत्तेला ‘चले जाव’ चा इशारा दिला ‘लढेंगे या मरेंगे’ ची घोषणा झाली व त्याच रात्री स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेत्यांना अटक झाली व ‘चले जाव’ आंदोलन पूर्ण देशभर पसरले. म्हणूनच ‘ऑगस्ट क्रांती मैदान’ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक प्रेरणास्थान असून, भारताच्या पुढील पिढीला स्वातंत्र्यलढयाचा इतिहास उलगडण्यासाठी सर्व भारतीयांसाठी असलेले हे ठिकाण ऐतिहासिक दृष्टया जतन करून, स्वातंत्र्यलढयातील सैनिकांचे एक स्मारक सुशोभित करुन जतन करण्याचा महापालिकेचा उद्देश आहे.

मैदानाच्या सुशिभिकरणात कोणती केली जाणार कामे

– मैदानाच्या कुंपणभिंतीला लोखंडी जाळया व ओतीव लोखंडी दरवाज्यांची दुरुस्ती व उभारणी करणे

– मैदानातील अंतर्गत कुंपण कमी करणे.

– मैदानातील कॉक्रीट व लादयांचे पदपथ कमी करून मातीचे पदपथ तयार करणे. पावसाळ्यात मैदानात पाणी साचू नये म्हणून पर्जन्यजलवाहिन्या टाकण्यात येणार

– मैदानाच्या पूर्व भिंतीला भित्तीचित्राद्वारे स्मारक (म्युरल) बनवणे.

– मैदानात व सभोवताली आसनव्यसस्था, झाडांच्या कुंडया

– दिवाबत्ती व कचरापेट्यांची व्यवस्था करणे.

– मैदानाच्या पदपथावर असलेली बेस्टची टर्मिनल चौकी, घनकचरा चौकी व स्वच्छतागृह योग्य जागी स्थलांतरीत करणे. झाडांच्या सभोवती संरक्षक तट बांधणे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.