वसईत कंपनीला भीषण आग; ३ कामगार गंभीर

102

वसईत एका कंपनीच्या बाॅयलरला आग लागल्याने भीषण आग लागली आहे. आगीच्या धुराचे कल्लोळ आजूबाजूच्या ४ ते ५ किलोमीटर परिसरातून दिसत आहेत. कंपनीत स्फोट होऊन ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीत ३ कामगार गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ वसई जूचंद्र वाकीपाडा परिसरातील कंपनीत बुधवारी, २८ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर पोहचल्या असून त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र अजून किती कामगार या आगीत अडकले आहेत, हे अजून स्पष्ट झाले नाही.

(हेही वाचा मोबाईल फोनचा गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! IMEI नंबरची करावी लागणार नोंदणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.