केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये यंदाच्या बजेटमध्ये सात घटकांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजेच खास मिशन सप्तर्षीवर आधारित हे बजेट असल्याचे सीतारामण यांनी स्पष्ट केले आहे.
सामान्यांना अनेक अपेक्षा
महागाई, जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीचे संकट आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास सुरूवात केली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा अखेरचा अर्थसंकल्प आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पातून सामान्यांना अनेक अपेक्षा आहेत.
मिशन सप्तर्षी; अर्थसंकल्पाचे ‘सात’ आधार
- सर्वसमावेश विकास
- शेवटच्या/वंचित घटकांपर्यंत विकास
- पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक
- क्षमता विस्तार
- हरित विकास (ग्रीन ग्रोथ)
- युवक
- आर्थिक क्षेत्र