मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने वाचवले ३१ जणांचे प्राण

117

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) कर्मचारी केवळ रेल्वेच्या मालमत्तेचेच रक्षण करण्यासाठीच नव्हे तर कर्तव्यावर असलेल्या इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठीही नेहमीच आघाडीवर असतात आणि यासाठी चोवीस तास जागरुक असतात.

आतापर्यंत ३१ जणांचे प्राण वाचवले

मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी “मिशन जीवन रक्षक” चा एक भाग म्हणून जानेवारी ते मे २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेवर काही वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून आतापर्यंत ३१ जणांचे प्राण वाचवले आहेत. या घटनांचे काही व्हिज्युअल प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या ३१ घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात १६ जीव वाचवणाऱ्या घटनांची नोंद झाली आहे. भुसावळ आणि नागपूर विभागात प्रत्येकी ६ जीवरक्षक घटना, पुणे विभागात २ जीव वाचवण्याच्या घटनेची आणि सोलापूर विभागात एक जीव वाचवण्याच्या घटनेची नोंद झाली आहे. २०२१ या वर्षात मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी ५२ प्रवाशांचे प्राण वाचवले त्यापैकी ३५ जीव वाचवण्याची प्रकरणे फक्त मुंबई विभागात नोंदवली गेली.

( हेही वाचा : रविवारी पाच तासांचा मेगाब्लॉक, हार्बर रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन)

रेल्वे संरक्षण दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका आणि ट्रेन तसेच रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना आरपीएफ जवानांना करावा लागतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.