ट्रक अपघातानंतर भीषण अग्नीतांडव; चंद्रपुरात 9 जीव जिवंत जळाले

103

चंद्रपूर- मूल महामार्गावर अजयपूर येथे पेट्रोल टॅंकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. चंद्रपूर मूल महामार्गावर अजयपूर गावाजवळ गुरुवारी रात्री हा अपघात झाला होता. पेट्रोल टॅंकर आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर, आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली. मूल- चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी सकाळपर्यंत ही आग विझवली. आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्ये नजरेत पडली. यात 9 जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सध्या तपास सुरु

आग इतकी भयंकर होती की, ट्रकमधील लोकांचा कोळसा झाला. प्लास्टिक पोत्यांमधून हे शव चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. यातील टॅंकरमधील चालक अमरावती निवासी हाफीज खान आणि वाहक वर्धा निवासी संजय पाटील यांचा मृतात समावेश आहे. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांचा या भीषण आगीत जळून कोळसा झाला. ट्रकमधील 7 जण बल्लारपुर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघात नेमका कसा झाला?  याचा तपास सध्या सुरु आहे.

(हेही वाचा: महिला पोलीसांना धक्का लागल्याचं फूटेज दाखवा आता राजकारण सोडेन; संदीप देशपांडेंचे आव्हान)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.