लव्ह जिहाद: मुसलमानांचे रितीरिवाज पाळण्यास विरोध केल्याने हिंदू मुलीची हत्या

142

राज्यात पुन्हा एकदा लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. धार्मिक रीतीरिवाज पाळत नाही आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मीय लग्न केलेल्या मुस्लिम पतीने आपल्या हिंदू पत्नीची गळा चिरुन भर रस्त्यात केली आहे. हा धक्कादायक प्रकार मुंबईतील चेंबूर परिसरात सोमवारी रात्री घडला. इक्बाल मदमंद शेख असे आरोपीचे नाव आहे. टिळनगर पोलिसंनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पहिल्या पत्नीकडून मूल होत नाही म्हणून इक्बाल शेख नावाच्या या आरोपीने रुपाली चंदनशिवे या हिंदू मुलीशी तीन वर्षांपूर्वी लग्न केले होते. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. मात्र लग्नानंतर रुपालीला मुस्लिम रीतिरिवाज पाळण्याची जबरदस्ती करण्यात येत होती. रुपालीने यासाठी नकार दिल्याने दोघांमध्ये रोज भांडणं व्हायची. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून ते विभक्त झाले होते. मात्र सोमवारी संध्याकाळी इक्बाल शेखने भेटण्यासाठी रुपालीला नागेवाडी भागात बोलावले आणि भर रस्त्यात तिच्यावर चाकूने वार करुन पळ काढला. यात रुपालीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी इक्बालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

( हेही वाचा: ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश देण्यास विरोध )

काय आहे नेमके प्रकरण?

आरोपी इक्बाल महंमद शेख आणि रुपाली रमेश चंदनशिवे यांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसांतच ती इक्बालच्या घरी राहायला आली. परंतु आंतरधर्मीय विवाह असल्याने रुपालीला लग्नानंतर मुस्लिम परंपरा पाळायला जमत नव्हते. इक्बालच्या कुटुंबियांकडून तिच्यावर परंपरा पाळण्यासाठी, बुरखा परिधान करण्यासाठी दबाव टाकला जात होता. मात्र, रुपाली त्यांचे ऐकत नव्हती. त्यामुळे तिचे इक्बालसह त्याच्या कुटुंबियांसोबत दररोज भांडण होऊ लागले.  इक्बाल आणि कुटुंबियांच्या दबावाला आणि भांडणाला कंटाळून रुपाली सहा महिन्यांपूर्वी वेगळी राहत होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.