कंपनीत पाण्याचा टँकर पुरविण्यावरुन वाद… तरुणाची भर रस्त्यात हत्या

घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून, भर रस्त्यात तरुणाची हत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

82

पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपनीला पाण्याचा टँकर न पुरवल्याने एका तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी 14 मे रोजी सायंकाळी महाळुंगे येथील रेणुका हॉटेल समोर घडली. अतुल तानाजी भोसले (वय २६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, हल्ला करणारी टोळी फरार झाली आहे. घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून, भर रस्त्यात तरुणाची हत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

हल्ला झालेला हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर चाकण येथील खासगी दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचार करुन, पुढील उपचारासाठी चिंचवड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना १५ मे रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला. अतुल भोसले याची कंपनिशी संबंधित असलेल्या अक्षय शिवळे याच्यासोबत कंपनीला पाण्याचे टँकर पुरवण्यावरुन फोनवर बाचाबाची झाली होती. त्यानंतर अतुलवर हल्ला केला, अशी माहिती अतुलचा मित्र अक्षय पंडित बोऱ्हाडे याने महाळुंगे पोलिस ठाण्यात दिली आहे.

गुन्हा दाखल

दरम्यान, याप्रकरणी अक्षय अशोक शिवळे, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव व तीन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश यमगर, गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार योगेश आढारी करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.