ऑपरेशनल अडथळे दूर…आता मुंबई लोकल धावणार सुसाट!

92

मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क चालवणाऱ्या भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे (WR) झोनने जाहीर केले आहे की, अत्यावश्यक मुंबई लोकल गाड्या आता अधिक वेगाने धावतील. रेल्वेने ऑपरेशनल अडथळे दूर करण्यासाठी तसेच ट्रेनच्या ऑपरेशनमध्ये गतिशीलता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी या मार्गावर अनेक कामे केली आहेत. ऑपरेशनल लाईन्सवरील अनेक अडथळे यशस्वीरित्या दूर केल्यामुळे, मुंबई उपनगरीय गाड्यांची वक्तशीरता 2019-20 मध्ये 95% वरून 2021-22 मध्ये 99.3% पर्यंत वाढली आहे.

अंमलात आणलेले बदल

मरीन लाईन्सवरील 20kmph चे कायमस्वरूपी वेग प्रतिबंध (PSR) काढून टाकले आहे ज्यामुळे प्रति ट्रेन 2 मिनिटे किंवा एका दिवसात 560 मिनिटे वाचतात. तर, वांद्रे आणि खार विभागादरम्यान 60kmph प्रतिबंध देखील काढून टाकण्यात आला आहे. सांताक्रूझ येथील 3 लाईन क्रॉसओवर 2 लाईन क्रॉस ओवर मध्ये रूपांतरित करण्यात आले आहे, ज्यामुळे वेग 15 किमी प्रतितास वरून 30 किमी प्रतितास पर्यंत वाढवणे शक्य झाले.

( हेही वाचा : नवी दिल्लीत ओमिक्रॉनचा शिरकाव, देशातील रुग्णसंख्या 5 वर )

वेग वाढणार

वेगावरील निर्बंध शिथिल केल्यामुळे हार्बर मार्गावरील गाड्यांची गती 35kmph वरून 50kmph पर्यंत वाढली आहे. यामुळे गाड्यांचा वक्तशीरपणा वाढेल असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या शिथिल केलेल्या नियमांमुळे मुंबईकरांच्या लाईफलाईनचा अर्थात लोकल ट्रेनचा वेग वाढणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.