‘गंगुबाई काठियावाडी’ पुन्हा वादात! मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

108

प्रत्येक जण आतुरतेने वाट पहात असलेला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील ‘कामाठीपुरा’चा उल्लेख वगळण्यात यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, एका याचिकेवर आज सुनावणी होणार असून दुसऱ्या जनहित याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.

( हेही वाचा : वांद्रयाच्या किल्ल्याजवळ एक कोटींचा ट्री हाऊस! )

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

संजय लीला भन्साळी दिग्दर्शक असलेला ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या मागे ग्रहण लागले आहे. गंगुबाई काठियावाडी यांचे पुत्र रावजी शाह यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी या चित्रपटामुळे आमची बदनामी होत असल्याचे म्हटले होते. मात्र न्यायालयाने हा चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आणि कामाठीपुरा येथील रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल केलेल्या आहेत.

( हेही वाचा : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण! )

‘त्या’ शब्दामुळे परिसराची बदनामी 

रहिवाशांनी दाखल केलेल्या याचिकेत या चित्रपटामुळे आमच्या स्थानिक परिसराची बदनामी होत आहे, त्यामुळे चित्रपटातून कामाठीपुरा या शब्दाचा उल्लेख पूर्णपणे वगळण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. या याचिकेवर आज (मंगळवारी) उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुनावणी करणार आहे. तर आमदार पटेल यांनी केलेल्या जनहित याचिकेत काठियावाडी समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्यामुळे शीर्षकातील काठियावाडी हा शब्द वगळण्यात यावा ही विनंती पटेल केली आहे. पटेल यांच्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.