वर्ध्यात पावसाचा कहर! ४२ गावांचा संपर्क तुटला, २४ तासांत १३६ मि.मी. सरासरी पावसाची नोंद

103

राज्यात वर्धा जिल्ह्यात २४ तासांमध्ये १३६ मि.मी. सरासरी पाऊस झाला. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याचे माहिती मिळाली आहे. वर्धा जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू असून रविवारी सायंकाळपासून पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टी आल्याने नदी नाल्यांना पूर आल्याने ४२ गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील ७, सेलू तालुक्यातील ९, देवळी तालुका ६, हिंगणघाट तालुका ६, समुद्रपूर तालुका ५, आर्वी तालुका ६ आणि कारंजा तालुका ३ गावांचा समावेश आहे.

(हेही वाचा – गोदावरी, प्राणहिता पाणलोट क्षेत्रात नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा)

अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने ऐकेरी वाहतूक 

कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५.९ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदो इशारा पातळी वरून वाहत आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा दिनांक ३०.०७. २०२२ पर्यंत सकाळी ०६ वा. पासून ते सायंकाळी ०७. वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली असून, सायंकाळी ०७. वा. ते सकाळी ०६ वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ते ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणारी अनुस्कुरा घाटातील वाहतूक दरड कोसळल्याने ऐकेरी वाहतूक सुरु आहे.

जिल्ह्यात ३५ मदत केंद्रे सुरू

नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ११३ मिमी एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. सदर नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आला आहेत. जिल्ह्यात सध्या १०६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत. लक्ष्मी बॅरेज (मेडीगडा) चे ८५ पैकी ८५ गेट उघडलेले आहेत.

बचावाकरिता NDRF व SDRF टीम तैनात

तर गोदावरी व प्राणहिता नदी च्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यात आहे तरी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १३६.४ मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याचे माहिती मिळाली आहे. त्यांच्या बचावाकरिता NDRF टीम व दोन SDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्य:स्थिती

राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आत्ता पर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आत्ता पर्यंत अति वृष्टीमुळे १०५ नगरिकांनी आपला जीव गमावला आहे तर १८९ प्राणी दगावले आहेत.

राज्यात NDRF च्या १७ तुकड्या तैनात

  • मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२,
  • पालघर -१, रायगड- महाड- १,
  • ठाणे-२,
  • रत्नागिरी-चिपळूण -२,
  • कोल्हापूर-२,
  • सातारा-१,
  • सिंधुदुर्ग-१,

गडचिरोली -१ या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१ , वर्धा-२ अशा एकूण चार राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत. मुंबई -३, पुणे-२ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-२, अशा एकूण २ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.