धक्कादायक! एकाच वेळी 6 मैत्रिणींनी विषं खाल्लं, कारण वाचून थक्क व्हाल

138

बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाचवेळी सहा मैत्रिणींनी विष खाल्याची बातमी उघड झाली आहे. यातल्या तिघींचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मात्र परिसरात खळबळ उडाली आहे. बिहारच्या औरंगाबादमधील ही घटना आहे. या सहा मैत्रिणींपैकी एकीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्या तरुणाने लग्नाला नकार दिल्याने सगळ्या तरुणींनी विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

प्रकृती चिंताजनक

शुक्रवारी संध्याकाळी सहा मैत्रिणींनी एकाचवेळी विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यापैकी तिघींचा मृत्यू झाला असून, तिघींची प्रकृती नाजूक आहे. त्यांच्यावर मगध वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्या तिघींची प्रकृती चिंताजनक आहे.

( हेही वाचा:कोरोना पुन्हा काढतोय डोकं वर! महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राचा अलर्ट )

म्हणून सगळ्याच मैत्रिणींनी खाल्ले विष 

मिळालेल्या माहितानुसार, मृतांपैकी एका तरुणीचे तिच्या भावाच्या मेहुण्याशी प्रेमसंबंध होते. तिने याची माहिती मैत्रिणींना देखील दिली होती. मात्र त्या तरुणाने लग्नास नकार दिला. या प्रकारानंतर या सगळ्या तरुणी गावाकडे परतल्या आणि त्यातल्या प्रेयसीने मिळालेल्या नकारानंतर विष खात असल्याचे तिच्या मैत्रिणींनी पाहिले. त्यानंतर या सगळ्याच मैत्रिणींनी विष खाल्ले. या सगळ्या तरुणी गुरुकुलला गेल्या होत्या तिथून परतल्या नंतर या तरुणींनी विष खाल्याचे समजते आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.