रेल्वे हद्दीतील गुन्हेगारीत वाढ; मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत 14 हजार गुन्हे

89

कोरोनाचे नियम शिथिल होताच लोकल गाड्यांना पूर्वीप्रमाणेच गर्दी होऊ लागली. याच गर्दीचा फायदा घेऊन मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या हद्दीत खून, चोरी, दरोडे, विनयभंग इत्यादी गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.

रेल्वेच्या हद्दीत जानेवारी 2021 पासून जुलै 2022 पर्यंत विविध प्रकारचे एकूण 14 हजार 334 गुन्हे घडले. जानेवारी- डिसेंबर 2021 या काळात विविध प्रकारच्या 6 हजार 719 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गुन्ह्यांची संख्या वाढतेय परंतु त्यांची उकल करण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. लोकलमधील गर्दीचा फायदा घेत फलाट, पादचारी पूल आणि लोकल गाड्यांमध्ये चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. चोरांनी प्रवाशांचे मोबाईल, पाकिट, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असलेल्या बॅगांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली. तर गर्दी नसलेल्या ठिकाणी महिलांची छेडछाड, विनयभंगाबरोबरच चोरीच्या उद्देशाने मारहाणीच्याही घटना घडू लागल्या आहेत.

आरोपींची धरपकड

दोन्ही उपनगरीय रेल्वे मार्गावर 2021 पासून 14 हजार 334 गुन्हे घडले आहेत. यापैकी 5 हजार 880 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले तर 6 हजार 239 आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी मध्य रेल्वेवर 3 हजार 747 आणि पश्चिम रेल्वेवर 2 हजार 492 आरोपींना अटक करण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले.

( हेही वाचा: नेताजींनी ब्रिटिशांविरुद्ध एल्गार पुकारलेले मैदान सिंगापूरचे राष्ट्रीय स्मारक )

136 गुन्हेगार तडीपार

विविध गुन्ह्यात अटक केलेले आणि त्यानंतर शिक्षा भोगूनही वारंवार गुन्हे करणा-या 136 आरोपींना तडीपार करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.