भारत 2027 ला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार

102

कोरिया आणि तैवानसारख्या इतर आशियाई उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती सकारात्मक आहे, असे प्रतिपादन माॅर्गन स्टॅनलेचे इमर्जिंग मार्केट इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट जोनाथन गार्नर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. भारत सर्वात महागड्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि भारतात FY22 मध्ये कमाईत वाढ झाली आहे. तर कोरिया आणि तैवानसारख्या अर्थव्यवस्थांना सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे फटका बसला आहे. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था अधिक चांगली आहे आणि 2023 साठी कमी चलनवाढ आणि कमी दरवाढ यावर बाजाराचा दृष्टीकोन सकारात्मक असल्याचे गार्नर म्हणाले.

( हेही वाचा: एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या ब्लू टिक सबस्क्रिप्शनबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय )

आम्हाला विश्वास आहे की भारत 2027 पर्यंत जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी- सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे आणि या दशकाच्या अखेरीस तिसरा सर्वात मोठा स्टाॅक मार्केट असेल, असे माॅर्गन स्टॅनलीचे भारतासाठी मुख्य इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट रिधम देसाई यांनी म्हटले आहे. परिणामी, भारत जागतिक व्यवस्थेत सामर्थ्य मिळवेल आणि हे वैशिष्ट्यपूर्ण एका पिढीतील बदल आणि गुंतवणूकदार आणि कंपन्यांसाठी एक संधी सूचित करणारे ठरतील असेही त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.