स्वातंत्र्यदिनापूर्वी जम्मू काश्मिरमध्ये आत्मघातकी हल्ला; तीन जवान हुतात्मा तर दोन दहशतवादी ठार

83

सैन्य दलावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात तीन जवान हुतात्मा झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू- काश्मीर येथील राजौरीमध्ये ही घटना घडली. सैन्य दलाच्या अधिका-यांनी याबाबतची माहिती दिली. भारतीय सैन्याचे तीन जवान हुतात्मा झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर लष्कराने केलेल्या प्रत्युत्तरात दोन अतिरेक्यांचा खात्मा झाला आहे. राजौरीपासून 25 किलोमीटर दूर असलेल्या एका सैन्य दलाच्या ऑपरेटिंग बेसवर आत्मघातकी हल्ला अतिरेक्यांनी केला. या हल्ल्यात तीन जवानांना वीरमरण आले. सध्या चेकपोस्ट कसून तपास करत आहे.

( हेही वाचा: जालन्यात स्टिल कारखानदारांच्या घरात सापडले 390 कोटींचे घबाड, 32 किलो सोनं! )

भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी

जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह म्हणाले, राजौरीतील परगल, दारहाल भागातील लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडण्याचा कोणीतरी प्रयत्न केला, त्यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. दारहाळ पोलीस ठाण्यापासून सहा किलोमीटर अंतरापर्यंत अतिरिक्त पथके पाठवण्यात आली आहेत. यात दोन दहशतवादी ठार झाले असून, लष्कराचे दोन जवानही जखमी झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.