Maharashtra SSC Result 2021: 10वीच्या निकालाचा भोपळा आज फुटणार… दुपारी होणार निकाल जाहीर

82

गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची वाट बघत असणारे 10वीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शुक्रवार 16 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा(बोर्डा)च्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आपला निकाल बघता येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

50:30:20 फॉर्म्युला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. निकाल हा 100 गुणांचा असून, त्यात 9वी आणि 10वीच्या गुणांवर आधारित असणार आहे. यासाठी 50:30:20 फॉर्म्युला वापरण्यात आला आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

कोरोनाची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने 12 मे रोजी इयत्ता 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मूल्यमापनाचा 50:30:20 फॉर्म्युला राज्य सरकारकडून 28 मे रोजी जाहीर करण्यात आला. एकूण 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये 9 लाख 9 हजार 931 मुले, तर 7 लाख 47 हजार 692 मुली अशी एकूण 16 लाख 58 हजार 624 मुलांचा समावेश आहे, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

इथे पाहता येईल निकाल

www.mahresult.nic.in

या वेबसाईट वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

असा लागणार निकाल

  • इयत्ता 10वीत वर्षभरात घेण्यात आलेल्या अंतर्गत लेखी परीक्षांना मूल्यमापनात 30 गुण देण्यात येतील.
  • 10वीच्या वर्षात गृहपाठ, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापनात 20 गुण देण्यात येतील.
  • इयत्ता 9वीच्या अंतिम निकालातील प्रत्येक विषयाला मिळालेल्या गुणांपैकी अंतर्गत मूल्यमापनात 50 गुण, याप्रमाणं निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

11वी प्रवेशासाठी सीईटी

  • राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांत 11वीला प्रवेश घेणा-या एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, आंतरराष्ट्रीय मंडळांत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
  • ही साईटी विद्यार्थ्यांसाठी संपूर्णपणे ऐच्छिक असणार आहे.
  • ही परीक्षा 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
  • इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न या परीक्षेत विचारण्यात येतील.
  • प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी(Multiple Choice Question) असतील.
  • 100 गुणांची एक प्रश्नपत्रिका असून, त्यासाठी 2 तासांची वेळ देण्यात आली आहे.
  • ही परीक्षा ऐच्छिक असल्याने 10वीच्या निकालानंतर राज्य मंडळाच्या पोर्टलवर परीक्षेसाठी ऑप्शन देण्यात येईल.
  • राज्य मंडळा(एसएससी)च्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेसाठी फी भरली असल्याने, त्यांना या सीईटीसाठी कुठलीही फी भरावी लागणार नाही.
  • सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांना मात्र, या परीक्षेसाठी फी भरावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.