धोनीच्या पत्नीने राज्य सरकारला विचारला जाब, म्हणाली आम्ही टॅक्स भरतो तरीही…

127

कोळसा टंचाईमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये भारनियमनाची परिस्थिती आहे. अनेक राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. याच संकटावर आता भारताचा स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीने राज्य सरकारला जाब विचारला आहे. भारनियमनावरुन साक्षीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ट्वीट करत जाब विचारला आहे.

इतक्या वर्षांपासून वीज संकट का आहे?

महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्येही वीज संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे धोनीची पत्नी साक्षी हिने सरकारला जाब विचारत प्रश्न उपस्थित केला आहे. तिने ट्विट करुन या संदर्भात प्रश्न विचारला आहे की राज्यात इतक्या वर्षांपासून वीज संकट का आहे? सोमवारी 25 एप्रिलला ट्वीट करत, साक्षी म्हणाली की मी झारखंडची एक टॅक्स भरणारी व्यक्ती आहे, म्हणून मला जाणून घ्यायचे आहे की झारखंडमध्ये इतक्या वर्षांपासून वीज संकट का आहे?

( हेही वाचा: आता बेस्टमध्येही करता येणार रिझर्व्हेशन )

याआधीही विचारलाय जाब

राज्यातील वीज संकटावर बोलण्याची साक्षीची ही पहिली वेळ नाही. याधीही 2019 साली साक्षीने सोशल मीडियावरुन प्रश्न विचारला होता. त्यावेळी साक्षी म्हणाली होती की, रांचीमधील लोकांना रोज भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. रोज चार ते सात तास वीज नसते. इतक्या जास्त प्रमाणात भारनियमन का केले जाते? याचे कारण कळाले नाही.  मला आशा आहे की अधिकारी यावर काहीतरी तोडगा काढतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.