आषाढी वारीसाठी ‘एसटी’ महामंडळ सज्ज! 530 अतिरिक्त गाड्या; गाव ते पंढरपूर विशेष सेवा!

111

यंदाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने पुणे विभागातून 6 ते 14 जुलै या कालावधीत 530 बसेस सोडण्यात येणार आहेत. आषाढी वारीसाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातील लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात. या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या पुणे विभागात तयारी सुरू करण्यात आली आहे तसेच 40 व्यक्ती एकत्रित एसटी महामंडळाची बस बुक करू शकतात ही बस संबंधितांचे गाव ते पंढरपूरपर्यंत सेवा देईल.

एसटी महामंडळाची विशेष सुविधा 

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येत्या 20 जून रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे, तर 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी स्वारगेट आगारातून 70 बसेस 17 जूनपासून सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा : MSRTC : आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या)

सासवडला पालखीचा मुक्काम असतो. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे पालखी सोहळा न झाल्याने यावर्षी अधिक संख्येने भाविक पंढरपूरला येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने सासवड ते पुणे प्रवासासाठी 150 बसेस भाविकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. गावातील वारकऱ्यांनी एकत्रितपणे बसचे बुकींग केल्यास त्यांना गावातूनच बससेवा मिळेल यासाठी 40 व्यक्तींची संख्या आवश्यक असून ही बस प्रवाशांना पंढरपूर येथे सोडेल. त्यानंतर परतीच्या प्रवासात पुन्हा त्यांच्या गावी सुद्धा सोडेल. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.