कबाबच्या सळईने फाडले काळीज…कारण वाचून थक्क व्हाल

86

मोबाईल फोन रिपेअरिंगच्या वादातून तरुणाच्या छातीत कबाबची गरम सळई भोसकून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना मानखुर्द येथे घडली. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी ४ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

काय झाले नेमके?

अकबर उर्फ युसूफ अली पठाण (२४) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अकबर हा मानखुर्द मंडाळा येथील जनता नगर परिसरात राहत असून, जवळच असणाऱ्या इंदिरा नगर या ठिकाणी जुबेर याचे मोबाईल फोन रिपेअरिंगचे दुकान आहे. अकबरचा भाऊ हुसेन याने त्याचा मोबाईल फोन जुबेरकडे रिपेअरिंग साठी दिला होता. मोबाईल फोन व्यवस्थित रिपेअरिंग न झाल्यामुळे हुसेन जुबेरकडे गेला व त्याने फोन व्यवस्थित रिपेअरिंग झाला नसून पैसे परत कर असे जुबेरला सांगितले. त्यावेळी हुसेनसोबत त्याची आई आणि भाऊ अकबर हे देखील आले होते.

(हेही वाचाः मुंबईत नायजेरियन टोळी ड्रग्ज व्यवसायातून दिवसाला कमवते इतके कोटी…)

गरम सळईने घेतला बळी

जुबेर आणि हुसेनमध्ये शाब्दिक चकमक सुरु होती. त्याचवेळी जुबेरचा भाऊ जैनुल आणि त्याचे मित्र अहमद, सर्फराज, इर्शाद त्याठिकाणी आले. भाऊ जुबेरला मारहाण करत असल्याच्या संशयावरुन जैनुल आणि त्याच्या मित्रांनी अकबरला बाजूला घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान जैनुल याने शेजारी असलेल्या कबाबच्या दुकानातील लोखंडी गरम सळई घेऊन अकबरच्या छातीत भोसकली, यात अकबरचा जागीच मृत्यू झाला.

आरोपींना घेतले ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय खाडे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन, चारही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांना हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक खाडे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.