संपूर्ण गाव हादरले! एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या

104

उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरगापूर गावात शुक्रवारी रात्री एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तपासणीसाठी फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे. रॉड आणि धारदार शस्त्रांनी हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे सांगितले आहे.

( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉक; परशुराम घाट रोज ५ तास राहणार बंद )

अज्ञात गुन्हेगारांनी धारदार शस्त्राने वार करून केली हत्या

राहुल तिवारी (३७) आणि त्यांची पत्नी प्रीती तिवारी (३५, रा. नवाबगंज येथील खड्गापूर गावातील रहिवासी) यांच्यासह त्यांच्या तीन मुलींची अज्ञात गुन्हेगारांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. शनिवारी सकाळी घरातील सदस्य बाहेर न आल्याने शेजाऱ्यांना भीती वाटली. शेजारी घरात गेले असता बेडवर रक्ताने माखलेला मृतदेह दृष्टीस पडला. यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

तपास सुरू

पाच जणांच्या हत्येची माहिती मिळताच नवाबगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि क्षेत्र अधिकारी सोरांव येथे पोहोचले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. गंगापारचे पोलीस अधीक्षक अभिषेक कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, पाच जणांच्या हत्येची माहिती मिळाली आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.