राज्यात नव्या कोरोना रुग्ण वाढीचा दर चिंताजनक

119

राज्यात बुधवारी, २२ जून रोजी कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८३ टक्के एवढे नोंदवले गेले आहे. मात्र पहिल्यांदाच नव्या रुग्ण नोंदीत आणि डिस्चार्ज रुग्णांच्या नोंदीत कमी संख्येचा फरक आढळला.

राज्यात ३ हजार २६० नव्या कोरोना रुग्णांची नोंद

बुधवारी राज्यात ३ हजार २६० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याचवेळी कोरोना उपचारांतून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ५३३ एवढी नोंदवली गेली. परिणामी, रुग्णसंख्या वाढीचा दर नियंत्रणात राखण्यास आरोग्य यंत्रणेला यश आले. राज्यात सध्या २४ हजार ६३९ कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात आहेत. मात्र दरदिवसाला किमान ३ रुग्ण मुंबईत दगावत असल्याचे बुधवारी दिसून आले. बाकी इतर जिल्ह्यांत कोरोनाचा मृत्यूदर अभावानेच आढळून येत आहे. गेल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. राज्यात इतरत्र रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत नाही आहे. राज्यभरात मुंबईत १३ हजार ५०१ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार दिले जात आहेत. ठाण्यात ५ हजार ५२१, पुण्यात २ हजार ३१०, रायगडात १ हजार ८७, पालघरात ७५९ एवढी सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली आहे. नागपूरातही ८२२ कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात आहेत.

(हेही वाचा मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह! बंडखोर आमदारांशी केलेला असफल संवाद! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.