पीएफआयः भारताच्या भूमीतील एक विषारी कीड; मुस्लिम राष्ट्र बनवण्याचे कारस्थान

119

आपण आता स्वतंत्र भारत म्हणून अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत, ह्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान आणि आनंद वाटला पाहिजे. पण ह्या देशात अजूनही असे काही नीच देशद्रोही आणि विकृत मनोवृत्तीचे लोक आहेत, त्यांना ह्याचा फार मोठा विषाद वाटत असतो आणि ते सदैव आपल्या मातृभूमीच्या विनाशाची स्वप्ने बघत असतात. त्यासाठी नवनवीन कारस्थाने करीत असतात. कसेही करून ह्या नालायक लोकांना आणि त्यांच्या देशद्रोही संस्थांना येथे इस्लामी राज्य आणायचे आहे.

त्यांच्या विकृत मेंदूत असे काही जहाल विष पेरलेले आहे की ते हिंदुस्थानात ‘गजवा-ए-हिंद’, म्हणजेच पुनः पूर्वीसारखे इस्लामी शरीयत कायद्यावर आधारलेले आणि हिंदूंचा संहार करणारे राज्य आणू इच्छितात आणि त्यासाठी वाटेल ती साधने, जसे की दहशतवाद, जातीय दंगे, खून आणि अशीच इतर घातक कृत्ये करण्यास त्यांची बिनदिक्कत तयारी असते. ह्यातीलच एक नाव म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, (PFI). ही एक मुस्लिम युवक आणि युवतींची संघटना! वरकरणी ही संस्था मुस्लिम व्यक्तींच्या सामाजिक सहकार्यासाठी स्थापन झालेली आहे.

म्हणून पीएफआयचा जन्म

परंतु ह्या लोकांचे अंतःस्थ हेतू अतिशय भयानक आणि राष्ट्रद्रोही आहेत. ह्यांना हिंदुस्थानात पुन्हा मुसलमानी राज्य आणायचे आहे, म्हणजेच जसे मुघल साम्राज्य होते तसेच! त्यासाठी कुठल्याही थराला जाऊन बिनदिक्कतपणे काफिरांची हत्या करणे, त्यांच्या संपत्तीची लूट आणि त्यांच्या मुलीबाळींची हत्या किंवा अधिक दुर्दशा करणे, सक्तीने अथवा खोटी प्रलोभने देऊन धर्मांतर करणे, असे सर्व रानटी उपाय येथील निष्पाप प्रजेवर करण्याची खुली छुट ह्या संस्थेच्या सदस्यांना दिलेली असते. मग त्यासाठी शस्त्रास्त्र किंवा दारुगोळा कोठून आणणार ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ह्या संस्थेचा जन्म झाला आहे.

विध्वंसक कारवायांना सुरुवात

१९४७ साली आपण स्वतंत्र झाल्याबरोबर आपल्यावर फाळणीचे जबरदस्त संकट येऊन कोसळले. येथून अनेक मुस्लीम पाकिस्तानात गेले आणि तसेच अनेक हिंदू निर्वासित भारतात आले. भारताने येथे जे मुसलमान राहिले होते त्यांना आपल्या प्रजेत सामावून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ह्यातील काही कट्टर मुस्लिमांना मात्र भारतात इस्लामी राज्य स्थापनेचे वेध लागले होते. त्यामुळेच त्यांना ह्या देशाच्या बहुसंख्य हिंदू प्रजेशी मिळून मिसळून रहावे असे कधीच वाटले नाही. त्यांची संख्या जोवर अगदी कमी होती तोवर त्यांनी सामाजिक समरसतेचे नाटक केले, पण त्यांची संख्या पुरेशी वाढली त्यानंतर मात्र त्यांनी अनेक तऱ्हेच्या विध्वंसक कारवाया सुरू केल्या.

केरळात सर्वाधिक कार्यकर्ते

दुर्दैवाने त्यांच्यावर ह्या आधीच्या काँग्रेस सरकारने काहीही कारवाई केली नाही, त्यामुळे हे लोक फार शिरजोर झालेले होते आणि एखाद्या शेफारलेल्या गुंडाप्रमाणे ह्यांचा दुष्टपणा दिवसेंदिवस वाढत गेला. परंतु ह्या संस्थेच्या सर्व दुष्ट कारवायांसाठी पैसा लागतो आणि असा पैसा उत्पन्न करण्यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या कायदेशीर अथवा बेकायदेशीर युक्त्या वापरल्या जातात. हा पैसा मुख्यत्वेकरून हवाला मार्गाने आणला जातो. गेल्या ३० ते ४० वर्षांत अनेक होतकरू तरुण पश्चिम आशियातील दुबई, सौदी अरेबिया, अबू धाबी आणि इराक अशा आखाती देशांत, विविध नोकऱ्यांसाठी गेले आहेत. अशा तरुणांत केरळी मुस्लीम तरुणांचा मोठा वाटा आहे. म्हणूनच पीएफआयचे जास्तीत जास्त सदस्य केरळात तयार झालेले आहेत.

दंगे घडवण्यासाठी वापर

पश्चिम आशियाई देशांत, ज्यांना गल्फ देश अथवा आखाती देश म्हणण्यात येते, तेथे अनेक दहशतवादी संघटना जसे की आयसिस, अल कायदा गेली काही वर्षे खूप वेगाने पसरत आहेत. त्यांचे सदस्य अशा केरळी अथवा इतर भारतीय मुस्लीम युवकांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांच्याकडून सुरुवातीला हलकी कामे करून घेतात व नंतर त्यांना पद्धतशीरपणे लष्करी हत्यारे वापरणे, बॉम्ब बनवणे आदि घातपाती कार्याचे प्रशिक्षण दिले जाते. असे प्रशिक्षित दहशतवादी भारताच्या हद्दीत गुप्तपणे पेरून ठेवले जातात व दंगे आदि भडकवण्यासाठी त्यांचा पुरेपूर वापर केला जातो. (उदाहरणार्थ सीएए कायद्याच्या विरोधातील दिल्ली येथील दंगा.)

ह्यासाठी इस्लामवर प्रवचने वगैरे ठेवून ह्या गल्फ मध्ये काम करणाऱ्या तरुणांमध्ये पद्धतशीरपणे इस्लाम बद्दल प्रेम व आदर निर्माण केला जातो आणि एके दिवशी त्यांना दहशतवादी जाळ्यात ओढले जाते. हे लोक नंतर त्या संघटनेचे शिलेदार होऊन भारतात दहशतवादी कारवायांसाठी काम करतात आणि पदोपदी असलेल्या धोक्यांसमोर लवकरच मरुनही जातात. परंतु नवीन नवीन सावजे त्यांना भारतातून मिळतच असतात.

पीएफआयच्या दहशतवादी कारवायांसाठी फंडिंग

संस्थेसाठी पैसे गोळा करण्यासाठी अनेक वैध/ अवैध मार्गांचा हे लोक उपयोग करतात. त्यातील एक वैध मार्ग म्हणजे ह्या गल्फ मध्ये काम करणाऱ्या शेकडो व्यक्तींना दर महिन्याला काही हजार डॉलर्स, आपल्या कुटुंबाला भारतात पाठवण्यासाठी दिले जातात. रकमेचा हा आकडा भारतीय कायद्याच्या मर्यादेत बसेल इतकाच असतो. त्यामुळे तो देशाच्या पोलिस यंत्रणेच्या चटकन ध्यानात भरत नाही. हा पैसा भारतात आल्याबरोबर ह्यांच्या येथील मुले, मुली तो पीएफआयच्या स्थानिक प्रमुखाकडे देऊन टाकतात. त्याबद्दल त्यांना काही एक टक्के रक्कम दिली जाते. परंतु मूळ पैसा हा पीएफआयच्या दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी असलेल्या निधीमध्ये जमा केला जातो!

ह्या प्रकारे सध्या ह्या संघटनेकडे त्यांच्या स्थापनेनंतर, म्हणजेच २००६ सालापासून गेली अनेक वर्षे कोट्यवधी रुपयांचा निधी जमला आहे. तो पैसा वापरुन हा देश अस्थिर करण्याचे षड्‍यंत्र चालू आहे. सरकारला ह्या सर्व गोष्टींची माहिती होती पण सबळ पुरावे नव्हते. त्यासाठी अजित डोवल आणि अमित शहा ह्यांनी अतिशय काळजीपूर्वक योजना आखून ह्या सर्व दहशतवादी नेटवर्कची माहिती गोळा केली व त्यानंतर एके दिवशी ह्या सर्व नेटवर्कच्या सदस्यांवर धाडी घालून त्यांना उचलून दिल्लीला नेण्यात आले. आता ते सर्व तुरुंगात डांबले गेले आहेत आणि ह्या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे! त्यांची सर्व बँक खाती गोठवली गेली आहेत.

हा सर्जिकल स्ट्राईक

त्यांच्या सर्व मालमत्ता जप्त केल्या आहेत. ही कारवाई म्हणजे भारतातील दहशतवादी संघटनेवर एक ‘सर्जिकल स्ट्राइक’ आहे. आता ही आणि हिच्यासारख्या इतर काही संघटना सरकारी तडाख्यातून सुटणार नाहीत. शिवाय त्यांचा अर्थ पुरवठा आता बंद झाल्याने त्यांना पूर्वीसारखे पैसे वाटून दंगे घडवणे कठीण होत जाईल. भारताची सुरक्षा आता जास्त मजबूत होत आहे हे नक्की. म्हणजे नरेंद्र मोदी ह्यांचे सरकार भारताच्या बाह्य सुरक्षेबरोबरच अंतर्गत सुरक्षेचाही संपूर्ण विचार करत आहे हे ह्यावरून दिसून आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.