गर्भवतीला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने जुळ्या बाळांचा मृत्यू!

83

पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. या गावात रस्ता नसल्याने वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून नेण्यात आले. तिच्या कुटुंबीयांनी पायपीट करत दवाखाना गाठला. परंतु वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिला तिच्या जुळ्या बालकांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर बघावा लागल्याची दु्र्देवी घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – घरोघरी तिरंगा फडकावल्याबद्दल आयुक्तांनी मानले मुंबईकरांचे आभार)

एकीकडे देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा झाल्याचे पाहायला मिळाले तर दुसरीकडे अदिवासी पाडे आणि दुर्गम भागात मुलभूत सोयीसुविधा अद्याप पोहोचले नसल्याचे चित्र दिसतेय. दरम्यान, या गावातील ही दुसरी घटना असून रस्ता नसल्याने दोन-तीन महिलांना डोलीतून दवाखान्यात नेण्याची वेळ आल्याची माहिती मिळत आहे. या मोखाडा तालुक्यात अशी अनेक गावं आहेत, ज्यामध्ये सोयी सुविधांचा तुटवडा असल्याने नागरिकांना नाहक त्रास होताना दिसतोय.

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या सारख्या प्राथमिक सुविधा आदिवासींना मिळालेल्या नाहीत. तर आजही आदिवासींना रस्त्याअभावी डोलीकरून पायपीट करत दवाखान्यात जावं लागत आहे. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांना आपले प्राण देखील गमवावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.