पुणे गणपती विसर्जन मिरवणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

100

पुण्यातील गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीवरून पुण्यातील काही गणेश मंडळांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. पुणे गणपती विसर्जन मिरवणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे विसर्जन तोंडावर असताना स्वैर याचिका करणे चुकीचे असल्याचे सरकारने न्यायालयात म्हटले आहे. त्यामुळे गणेश मंडळांना मोठा धक्क बसला असून यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – पुण्यात FDA ची मोठी कारवाई! गणेशोत्सवात ९०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त)

पुण्यातील गणपती विसर्जन सोहळा अवघ्या काही तासांवर आला असताना मानाच्या मिरवणुकीवरून सुरू झालेल्या वादावरील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी या प्रकरणी सुनावणी पार पडली. पुण्यात मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक झाल्यानंतर अन्य मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी देण्याच्या परंपरेला यावेळी बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालायात आव्हान दिले होते. या अटी आणि परंपरा संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे, असा दावा करत त्यांनी न्यायालयात हे आव्हान दिले होते. मानाच्या गणपतीआधी छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी होती. न्यायालयात याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

पुण्यातील हजारो मंडळं आकर्षक विसर्जन रथ तयार करून त्यावर बाप्पाला विराजमान करत मिरवणुकीत सहभागी होतात. सकाळी 10 वाजेपासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत मानाच्या पाच गणपतीचे विसर्जन होता होता संपूर्ण दिवस संपतो. त्यामुळे इतर मंडळांचा खोळंबा होतो. याबाबत पोलीस आणि प्रशासनाकडे अनेकदा दाद मागून देखील दखल न घेतल्याने पुण्यातील गणेश मंडळांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.