आनंदाची बातमी! कोकणातील पर्यटनाला मिळणार चालना

130

कोकणातील बहुचर्चीत प्रकल्प आणि कोकणच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणा-या रेवस ते रेडी या सागरी महामार्गाचा सुधारित आराखडा सादर करण्यात आला आहे. या आराखड्याला आता राज्य सरकारची मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

इतका खर्च होणार

नव्याने तयार केलेल्या आराखड्यानुसार १६५ किलोमीटरचा रस्ता चौपदरी करण्याला मान्यता मिळाली आहे. तर या मार्गाचा उर्वरित रस्ता दुपदरी असणार आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे प्रकल्प खर्चात वाढीची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येत असलेला रेवस ते रेड्डी सागरी मार्ग ४९८ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गासाठी ९ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

म्हणून प्रकल्प अडकला होता

रेवस-रेडी महामार्गाची कल्पना दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी मांडली होती. त्यानंतर काही प्रमाणात या कामाला गतीही आली होती; मात्र निधीअभावी हा प्रकल्प रखडला. आता त्याची पुन्हा चर्चा सुरू झाली असून महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात नुकतीच आढावा बैठक घेतली. या वेळी नव्याने सादरीकरण करण्यात आले.

( हेही वाचा: यशवंत जाधव यांच्या डायरीतील ‘मातोश्री’ नक्की कोण?  )

पर्यटनाला मिळणार चालना

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.