देशातील ‘त्या’ होत्या पहिल्या शिक्षिका, ज्यांनी दिला स्त्री शिक्षणावर भर

87

3 जानेवारी 1831 ला देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. सावित्रीबाई फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील नायगाव, सातारा येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी महिलांची स्थिती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि भारतातील महिला शिक्षणाच्या नेत्या बनल्या. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या आधुनिक स्त्रीवाद्यांपैकी एक मानल्या जातात. 1840 मध्ये वयाच्या नऊव्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह 13 वर्षांच्या ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. बालविवाह, सती प्रथा यांसारख्या वाईट गोष्टींविरुद्ध त्यांनी आवाज उठवला.

स्त्री शिक्षणावर भर

पती ज्योतिबा यांच्यासमवेत त्यांनी स्त्री शिक्षणावर खूप भर दिला. मुलींसाठी देशातील पहिली शाळा सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतिबा यांनी 1848 मध्ये पुण्यात उघडली. यानंतर सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतिबा यांनी मिळून मुलींसाठी आणखी 17 शाळा उघडल्या. सावित्रीबाईंनी केवळ महिलांच्या हक्कांसाठी काम केले नाही, तर समाजात प्रचलित असलेल्या भ्रष्ट जातिव्यवस्थेविरुद्धही त्यांनी लढा दिला. जातिव्यवस्था संपवण्याच्या ध्यासाचा भाग म्हणून त्यांनी अस्पृश्यांसाठी त्यांच्या घरात एक विहीर बांधली होती. सावित्रीबाई या केवळ समाजसुधारक नसून त्या एक तत्त्वज्ञ आणि कवयित्रीही होत्या. त्यांच्या कविता मुख्यतः निसर्ग, शिक्षण आणि जातिव्यवस्थेचे निर्मूलन यावर केंद्रित होत्या.

( हेही वाचा: मुंबई महापालिका सज्ज! आजपासून 9 केंद्रांवर बच्चे कंपनीला मिळणार कोरोना लस )

सत्यशोधक समाजाची स्थापना केली

गरोदर बलात्कार पीडितांची दयनीय अवस्था पाहून सावित्रीबाईंनी पतीसोबत अशा पीडितांसाठी “बालद्वेष प्रतिबंधक गृह” नावाचे केअर सेंटर उघडले. ज्या काळात देशात जातिव्यवस्था शिखरावर होती, त्यावेळी सावित्रीबाईंनी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. त्यांनी आपल्या पतीसह ‘सत्यशोधक समाज’ स्थापन केला. 1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली आणि या साथीमुळे सावित्रीबाई फुले यांचे 10 मार्च 1897 रोजी पुण्यात वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.