सर्वोच्च न्यायालय म्हणतंय, “… म्हणून लहान मुलांना शाळेची सक्ती नको”

90

मुले दोन वर्षांची झाली की, त्यांना शाळेत पाठवावे अशी पालकांची इच्छा असते. परंतु, इतक्या कमी वयात मुलांना शाळेत पाठवल्यास त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होता. त्यामुळे मुलांना फार कमी वयात शाळेत पाठवण्याची सक्ती नको अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने मांडली आहे. न्या. संजय किशन कौल आणि न्या. एम.एम. सुदरेश यांच्या खंडपीठाने उपरोक्त भाष्य केले आहे.

पालकांच्या याचिकेवर खंडपीठाकडून सुनावणी

आगामी शैक्षणिक सत्रासाठी केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी 6 वर्षांच्या किमान वयाच्या निकषाला आव्हान देणाऱ्या पालकांच्या याचिकेवर खंडपीठाकडून सुनावणी झाली. यावेळी पालकांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या 11 एप्रिलच्या आदेशाला आव्हान दिले होते. यात केंद्रीय विद्यालय संघटनेने मार्च 2022 मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या केवळ चार दिवस आधी, इयत्ता पहिली ते सहा वर्षे प्रवेशाचे निकष अचानक बदलले असल्याचा दावा केला होता. पूर्वीचा नियम 5 वर्षांचा होता. यावर न्यायालयाने सांगितले की, मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय कोणते याचा अभ्यास करण्यात आला आहे. मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती करू नका, त्याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

(हेही वाचा – सदावर्तेंना उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर)

न्यायालयाने काय म्हटले?

या सुनावणी दरम्यान, केंद्र सरकारच्या वकिलांनी सांगितले की, 21 राज्यांनी 2020 मध्ये आलेल्या एनईपी अंतर्गत प्रथम श्रेणीसाठी सिक्स प्लस प्रणाली लागू केली आहे, मात्र या धोरणाला आव्हान दिले गेले नाही. यानंतर न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला दुजोरा देत अपील फेटाळून लावले. याच प्रकरणी 11 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात उच्च न्यायालयाने पालकांची याचिका फेटाळून लावली. सुरुवातीच्या वर्षातील शिक्षणामुळे मुलाच्या इतर क्षमता निर्माण होतात. ही चांगली गोष्ट आहे, परंतु लहान वयातच मुलांनी खूप लवकर लक्षात ठेवणे आणि कार्य करणे, हे मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.