स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात ‘या’ तारखेला होणार सुनावणी

116

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाबाबत गेल्या 4 महिन्यांपासून “तारीख पे तारीख पे” सुरु असून आता पुन्हा नवी तारीख मिळाली आहे.

( हेही वाचा : बाबरीच्या वक्तव्यावरून मनसेही आक्रमक! ट्विटरवर शेअर केला राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ)

सर्वोच्च न्यायालयाने मविआ सरकारची वॉर्डरचना मान्य केली तर कदाचित निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल. पण 23 महानगरपालिका, 207 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग त्या दोन टप्प्यांत घेऊ शकते, काही पावसाळ्याआधी आणि काही निवडणुका पावसानंतर होतील. परंतु, दुसरी शक्यता म्हणजे जर शिंदे सरकारची वॉर्डरचना न्यायालयाने मान्य केली तर नव्याने प्रक्रिया करण्यासाठी निवडणूक आयोगाला काही काळ लागेल. त्यामुळे या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे.

मुंबई- पुण्यासारख्या महापालिका निवडणुका या ऑक्टोबरपर्यंत जाऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका याआधी कोरोनामुळे नंतर ओबीसी राजकीय आरक्षणामुळे आणि आता सत्ताबदलामुळे रखडल्या आहेत. देशात इतरही राज्यांमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु त्या भागात निवडणुकांचा प्रश्न वेळीच मार्गी लागून निवडणुका होऊनही गेल्या आहेत, पण महाराष्ट्राच्या बाबतीत निवडणुका लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.