ग्वाल्हेरचे संस्थानिक Jivajirao Scindia यांचा जीवनप्रवास!

74
ग्वाल्हेरचे संस्थानिक Jivajirao Scindia यांचा जीवनप्रवास!
ग्वाल्हेरचे संस्थानिक Jivajirao Scindia यांचा जीवनप्रवास!

जिवाजीराव सिंधिया (Jivajirao Scindia) यांचा जन्म २६ जून १९१६ साली ग्वालीयर येथे झाला. ते ब्रिटीश राजवटीच्या काळात भारतातल्या वासल राज्याचे शासक होते. त्यानंतर ते एक सरकारी अधिकारी झाले. (Jivajirao Scindia)

(हेही वाचा- Mumbai Local: मुंबईकरांचा वेळ वाचणार, हार्बर लोकलचा प्रवास ‘इतक्या’ मिनिटांनी कमी!)

जिवाजीराव हे १९२५ ते १९४७ सालापर्यंत मध्य भारतातल्या ग्वालीयर संस्थानाचे शासक होते. त्यांचं राज्य स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतर त्यांना भारत सरकारतर्फे ग्वालीयरचे काही खाजगी विशेषाधिकार देण्यात आले. ते अधिकार त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत म्हणजे १९६१ सालापर्यंत कायम सांभाळले. त्यांनी १९५६ सालापर्यंत मध्य भारताचे राजप्रमुख म्हणजेच राज्यपाल म्हणूनही काम केलं होतं. (Jivajirao Scindia)

जिवाजीराव सिंधिया (Jivajirao Scindia) हे मराठा जनरल राणोजीराव सिंधिया यांचे वंशज होते. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धाच्या काळात राणोजीराव हे माळव्यातल्या मराठा सैन्याचे प्रमुख होते. त्याकाळच्या वाढत्या मुघल साम्राज्याच्या विस्तारामुळे दौलतराव सिंधिया यांनी आपली राजधानी उज्जैन येथून ग्वालीयरच्या किल्ल्याजवळच्या ऐतिहासिक लष्कर नावाच्या नव्या शहरामध्ये हलवली. (Jivajirao Scindia)

(हेही वाचा- Rain Update: पावसाने पुन्हा मारली दांडी; यंदाचा जून कोरडाच!)

१८१८ साली इंग्रजांविरुद्ध तिसरं युद्ध हरल्यानंतर दौलतराव सिंधिया यांनी इंग्रजांचं अधिपत्य स्वीकार केलं. ग्वालीयर हे मध्य भारत एजन्सीतलं सर्वात मोठं राज्य होतं. तसंच ते संपूर्ण भारतातल्या सर्वात मोठ्या पाच संस्थानांपैकी एक होतं. (Jivajirao Scindia)

५ जून १९२५ साली जिवाजीराव सिंधिया हे गादीवर बसले. त्यांनी नेपाळ इथल्या शक्तिशाली राणा घराण्यातल्या लेखा दिव्येश्वरी देवी यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर त्यांना लोक विजया राजे म्हणून ओळखायला लागले. जिवाजीराव सिंधिया आणि विजया राजे यांना चार मुली आणि एक मुलगा होता. (Jivajirao Scindia)

(हेही वाचा- Zika Virus: पुण्यात सापडले ‘झिका’चे 2 रुग्ण; काय काळजी घ्याल ?)

१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर जिवाजीराव सिंधिया (Jivajirao Scindia) यांनी काही काळ ग्वालीयर राज्यावर निरंकुश राज्य केलं. पण भारतीय संस्थानांच्या राज्यकर्त्यांना भारत स्वतंत्र कायद्याद्वारे विभागणी केलेल्या दोन अधिराज्यांपैकी (भारत आणि पाकिस्तान) कोणत्याही एका राज्यात प्रवेश करणे आवश्यक होतं. म्हणून जिवाजीरावांनी लगतच्या संस्थानांच्या राज्यकर्त्यांसोबत एक करार केला. या करारामुळे त्यांची अनेक राज्ये एकत्र करून मध्य भारत म्हणून ओळखलं जाणारं एक नवीन राज्य स्थापन केलं. (Jivajirao Scindia)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.