मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर उपराष्ट्रपती नाराज

81

राज्यसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून आज शुक्रवारी सभापती व्यंकय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यसभेत कामकाजाला प्रारंभ होताच नायडू यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. मात्र, ज्यांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते, त्यापैकी काही मंत्री अनुपस्थित होते. अन्य सहकारी मंत्र्यांनी त्यांची कागदपत्रे सादर केली. ज्या मंत्र्यांना आपल्या मंत्रालयाशी संबंधित कागदपत्रे सभागृहाला सादर करायची आहे, त्यांनी अनुपस्थित राहणे योग्य नाही, भविष्यात असा प्रकार पुन्हा होऊ नये, असेही नायडू म्हणाले.

सभागृहात सभापतींची परवानगी आवश्यक

परवानगीशिवाय सभागृहात बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका भाजपा सदस्याला नायडू यांनी समज दिली. राज्य कृषी उद्योग महामंडळाशी संबंधित कागदपत्रे सभागृहात सादर केल्यानंतर भाजपाचे हरनाथ यादव बोलायला उभे झाले. यादव यांनी बोलणे सुरू होताच नायडू यांनी त्यांना रोखले. तुमचे बोलणे कामकाजात नोंदवले जाणार नाही, असा इशारा दिला. तसेच सदस्यांनी सभागृहात सभापतींची परवानगी घेऊनच बोलले पाहिजे असे नायडू यांनी सांगितले.

( हेही वाचा : अखेर राज्यातील १०६ नगर पंचायतीच्या निवडणुका ओबीसीशिवाय… )

अनुपस्थित राहणे योग्य नाही

मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून नाराजी व्यक्त करत असे अनुपस्थित राहणे योग्य नाही असे व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. तसे भविष्यात असा प्रकार घडणार नाही याची काळची घ्यावी असेही नायडू म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.