काय आहे हलाल जिहाद? जाणून घ्या…

169

आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आक्रमण करून आपल्या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा पद्धतशीर प्रयत्न हलाल जिहादच्याद्वारे केला जात आहे. याबाबतची माहिती सविस्तर, शास्त्रशुद्ध आणि अनेक पुरावे सादर करून देण्यात आली आहे. या विषयात भारतीय जनतेला साक्षर करण्याच्या हेतूने हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण? हलाल जिहाद?’ या ग्रंथाचे लेखन केले आहे.

आपली संस्कृती कोणीही लादू शकत नाही

प्रत्येक राष्ट्राने आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे नैसर्गिक आहे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या सबळ होण्याचा अधिकार आहे. तथापि या अधिकाराचा गैरवापर करून संपूर्ण मानव जातीला उपद्रव देण्याचा अधिकार कोणालाही देण्यात आलेला नाही. आर्थिक बळावर कोणीही कोणालाही आपला गुलाम बनवू शकत नाही. तसेच आपले विचार, आपली खाद्य संस्कृती कोणीही कोणावरही लादू शकत नाही. तशी ती लादणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. आज आपण आधुनिक काळात वावरत आहोत. सर्वत्र भौतिक प्रगती आपल्याला आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर राक्षसी प्रवृत्तीची जोपासना करणे अक्षम्य अपराध आहे. असा अपराध हेतूत: करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात हा ग्रंथ लिहिण्यात आला आहे.

हलाल अर्थव्यवस्थेचे भीषण परिणाम

मुसलमान समाजाला जी गोष्ट पवित्र वाटते ती अन्य समाजाला पवित्र वाटेल असे नाही. त्यामुळे त्या समाजाने त्यांना पवित्र वाटणाऱ्या गोष्टी अन्य समाजाच्या माथी मारणे योग्य ठरत नाही. वर्ष २००७ मध्ये मध्य प्रदेश शासनाने इस्कॉन मंदिराकडे शाळेतील माध्यान्ह भोजन पुरवण्याचे कंत्राट दिल्यावर त्याला मुसलमानांनी विरोध केला. त्यावेळी मुसलमान मौलवींनी दावा केला की इस्कॉन संस्था शिजवलेले अन्न प्रथम जगन्नाथाला अर्पण करते. त्यामुळे हिंदू देवतेचा प्रसाद मुसलमानांना खाऊ घालणे हा इस्लामचा अपमान आहे.

(हेही वाचाः मुस्लिमांना दहशतवादी बनवणारी पीएफआय)

जर इस्कॉनने शिजवलेल्या माध्यन्ह भोजनाचा स्वीकार मुसलमान करणार नसतील तर हलाल भोजनाचा स्वीकार हिंदूंनी तरी का करावा? हलाल अर्थव्यवस्था संपूर्ण जगात स्वतःचा दबदबा निर्माण करत आहे. या अर्थव्यवस्थेने अल्पावधीत दोन अमेरिकी ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. संपूर्ण जगात हलाल अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. शरीयतवर आधारित एक अर्थव्यवस्था जगात उभी राहत आहे. या अर्थव्यवस्थेचा भीषण परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागत आहे.

हलाल प्रमाणपत्र असणारे मांसाहरी पदार्थ

जगात मांसाहार करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. हलाल पद्धतीने गळा कापलेल्या पशूला सर्वाधिक वेदना सहन कराव्या लागतात, असे वर्ष २००९ मध्ये न्युझीलँडच्या मॅसी विद्यापीठात संशोधन करणाऱ्या क्रेग जॉन्सन यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. अशा पद्धतीने उपलब्ध केलेले मांस मुसलमान समाजासाठी पवित्र असले तरी अन्य समाजासाठी ते पवित्र नाही. तरीही हलाल प्रमाणपत्र दिलेले मांसाहारी पदार्थ सर्वत्र विकले जात आहेत.

युरोपात बंदी

हलाल पद्धत अमानवी असल्याचे सिद्ध झाल्यावर डेन्मार्क, नेदरलँड, स्वीडन, स्वित्झर्लंड, बेल्जियम आणि इंग्लंड अशा अनेक देशांमध्ये सचेत पशूला हलाल करण्यावर वर्ष २०१७ मध्ये कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. यावर मुसलमानांनी न्यायालयात दाद मागितली. वर्ष २०२० मध्ये न्यायालयाने या कायद्याचे समर्थन करून हलाल पद्धतीने केली जाणारी पशु हत्या बंद करण्याचा आदेश दिला. अशा प्रकारे युरोप देशांमध्ये हलाल पद्धतीवर बंदी घातली गेली आहे.

(हेही वाचाः मुंबईत होणार हलाल परिषद, भारतात मुसलमानांची होतेय समांतर अर्थव्यवस्था)

हलाल अर्थव्यवस्था हे षडयंत्र

या हलाल अर्थव्यवस्थेतून मिळालेल्या पैशाचा उपयोग ऑस्ट्रेलियात शरीयत कायदा लागू करणे आणि कट्टरतावादी संघटनांना सहाय्य करण्यासाठी केला जातो असा संशय ऑस्ट्रेलियातल्या नॅशनल्स पक्षाचे खासदार जॉर्ज क्रिस्टेन्सेन यांनी केला आहे. प्राध्यापक डॉक्टर ताज हार्गी, ब्रिटिश इमाम यांनी हलाल प्रमाणपत्राबद्दल म्हटले, ‘हलाल प्रमाणपत्राच्या षडयंत्राची उगमस्थाने सौदीचे वहाबी कट्टरवादी, इजिप्तच्या इस्लामिक ब्रदरहुडची सलाफी विचारसरणी तसेच भारत आणि पाकिस्तान येथील सुन्नी कट्टरपंथीय ही आहेत. ब्रिटनमध्ये इस्लामी कट्टरतावादाचे मागच्या दाराने प्रवेश करण्याचे हे षडयंत्र आहे.’

आपल्या देशात हलाल प्रमाणपत्र देणारी जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट ही एक मुख्य संघटना आहे. या संघटनेने ७/११ चा मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट, वर्ष २००६ चा मालेगाव बॉम्बस्फोट, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट (पुणे), २६/११ चे मुंबईवरील आतंकवादी आक्रमण, मुंबई झवेरी बाजारातील साखळी बॉम्बस्फोट, कर्णावती बॉम्बस्फोट, अशा अनेक आतंकवादी प्रकरणातील आरोपींना निरपराध ठरवण्यासाठी सहाय्य केले आहे. एखाद्या निरपराध व्यक्तीवर अन्याय झाला असेल आणि त्याच्यावर खटला भरला गेला असेल तर त्याची निर्दोषता सिद्ध करण्यासाठी केलेली मदत ग्राह्य ठरू शकते.

अल्लाहला अर्पण केलेला पशूबळी कसा चालतो?

पण पोलिसांच्या तपासात दोषी आढळलेल्या आतंकवाद्यांना निरपराध ठरवण्यासाठी खटपट करणे संशयास्पद आहे. हिंदू मंदिरांसमोर पशूबळी देतात. याला केरळच्या कम्युनिस्ट सरकारने विरोध केला आणि तसा कायदाही अस्तित्वात आणला. या कायद्याला केरळच्या उच्च न्यायालयाने संमती दर्शवली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. याबाबतच्या याचिकेवर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणाले, ‘धर्माच्या आधारावर पशूची हत्या करणे अवैध आहे. पण तीच पशूहत्या मांस खाण्यासाठी करणे वैध आहे. हा आश्चर्यकारक तर्क आहे. त्याचप्रमाणे मंदिरासमोर दिलेला पशूबळी जर चालत नाही तर हलाल मांसासाठी अल्लाहला अर्पण केलेला पशूबळी केरळ शासनाला कसा चालतो?’

झोमॅटो, मॅकडोनाल्ड यांसारखी आस्थापनं पक्षपाती व्यवहार करताना आढळतात. याचे सप्रमाण उदाहरण या ग्रंथात पृष्ठ ६६ वर आपल्याला वाचायला मिळते. त्याचबरोबर लेखक रमेश शिंदे यांनी हलाल अर्थव्यवस्थेला देशात आणि विदेशात होत असलेल्या विरोधाचे दाखले देणारे स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. त्याचप्रमाणे हलाल प्रमाणपत्रासाठी शुल्क आकारणी कशी केली जाते त्याचेही विवरण पृष्ठ ४० वर करण्यात आले आहे. हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीने दिलेल्या लढ्याचा वृत्तांत अकराव्या प्रकरणात आपल्याला वाचायला मिळतो.

केवळ मांसाहारी पदार्थांवरच हलालचे प्रमाणपत्र आढळत नाही. तर ते अन्य वस्तूंवर ज्या वस्तू मांसाहारी नाहीत किंवा ज्या वस्तूंच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्राण्याच्या मांसाचा उपयोग केला जात नाही अशा वस्तूंवर सुद्धा हलाल प्रमाणपत्र लावण्यात आले आहे. जनतेने सजगपणाने आपण खरेदी करत असलेली वस्तू हलाल प्रमाणपत्राने प्रमाणित केलेली नाही ना हे पडताळून पाहावे आणि मगच खरेदी करावे. हलाल प्रमाणपत्र प्रमाणीत कोणतीही वस्तू आपल्याकडून खरेदी केली जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी. असे आवाहन या ग्रंथाच्या माध्यमातून लेखक रमेश शिंदे यांनी केले आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाने ध्यानात घ्यावी.

आर्थिक जिहादच्या विरोधात सनदशीर मार्गाने कसा लढा देता येतो, त्याचे मार्गदर्शनही करण्यात आले आहे. एकंदरीत हा ग्रंथ प्रत्येक भारतीय नागरिकांनी वाचावा आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे आर्थिक आक्रमण रोखण्याचा कृतीशील प्रयत्न करावा. एवढी माफक अपेक्षा ठेवून हा ग्रंथ लेखकाने लिहिला आहे. हा ग्रंथ वाचल्या वाचून आपल्याला हे आक्रमण रोखता येणार नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. म्हणूनच या ग्रंथाचा देशाची अर्थव्यवस्था अबाधित राहावी म्हणून अधिकाधिक प्रचार आणि प्रसार व्हावा‌ हा प्रधान हेतू आहे. त्याला बांधव उत्तम प्रतिसाद देतील याविषयी खात्री आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.