भारताचा ‘विराट’ विजय! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत घेतली आघाडी

114

विराट कोहलीचे शतक, रोहित आणि शुभमन या जोडीने केलेली दमदार सुरूवात आणि भेदक गोलंदाजीमुळे भारताने पहिल्याच वनडे सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला आहे. कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताना श्रीलंकेपुढे तब्बल ३७४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला चांगली फलंदाजी करता आली नाही आणि भारताचा ६७ धावांनी विजय झाला. वनडे मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.

( हेही वाचा : ५५ प्रवाशांना न घेताच विमानाने घेतले टेक-ऑफ! DGCA ने कंपनीला बजावली नोटीस )

भारताचा विजय 

रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी दमदार खेळी करक भारताला चांगली सुरूवात करून दिली होते. गिलने यावेळी ६० चेंडूत ७० धावा केला. तर रोहितने ८३ धावांची खेळी केली. यानंतर विराटने दुसरी बाजू सावरली आणि ११३ धावा करत आपले ४५ शतक केले. यावेळी विराटने १२ हजार ५०० धावांचा टप्पा ओलांडला आणि विश्वविक्रमाला गवसणी घातली.

विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड 

विराटने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने आपल्या १२ हजार ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. वेगवान धावा करत विराटने नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. त्याने २५७ इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडला आहे. सचिन तेंडुलकरने ३१० डावांमध्ये १२५०० धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर रिकी पॉंटिंग ( ३२८), कुमार संगकारा ( ३४५), सनथ जयसूर्या (४०२) आणि महेला जयवर्धने ( ४११) या खेळाडूंचा क्रमांक लागतो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.