भारताचा क्रिकेटपटू ‘पृथ्वी शाॅ’च्या गाडीवर हल्ला

200

भारतीय क्रिकेटर पृथ्वी शाॅ याच्या गाडीवर मुंबईत हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. हा हल्ला काही अज्ञातांकडून करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शाॅ याने सेल्फी काढण्यास नकार दिल्याने आठ लोकांच्या जमावाने त्याच्या गाडीवर हल्ला केला. मुंबईतील ओशिवारा परिसरात ही घटना घडली आहे.

सेल्फी काढण्यास ‘शाॅ’ ने दिला नकार

भारतीय संघाचा क्रिकेटर पृथ्वी शाॅ हा मुंबईतील ओशिवारा परिसरात आपल्या मित्रांसह कारमध्ये बसला होता. त्यावेळी तिथे काही लोक आले. त्यांनी पृथ्वी शाॅ याला सेल्फी तुझ्यासोबत सेल्फी काढायचे असल्याचे सांगितले. परंतु पृथ्वी शाॅ याने सेल्फि काडण्यास नकार दिला, त्याने नकार देताच रागाच्या भरात आठ-दहा लोकांच्या जमावाने पृथ्वीच्या कारवर हल्ला केला. याप्रकरणी पृथ्वी शाॅ याने ओशिवारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

( हेही वाचा: IND VS WI : भारताकडून वेस्ट इंडिजचा पराभव, उपांत्य फेरीकडे वाटचाल )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.