IPL 2022 : अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने घेतले आणि ट्रॉल्सने झोडले!

132

IPL 2022 चा लिलाव बराच चर्चेत आला आहे. दुपारपर्यंत ईशान किशनला १७ कोटीत खरेदी केल्यामुळे क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरू झाली होती, संध्याकाळपर्यंत आणखी एका क्रिकेट पटुमुळे हा लिलाव चर्चेत आला. नुसता चर्चेत आला नाही तर काही वेळातच सोशल मीडियात हा खेळाडू ट्रोल होवू लागला.

अर्जुनचे पुनर्वसन केले का?

अंबानीच्या मालकीच्या मुंबई इंडियन्सने क्रिकेट विश्वातील जगप्रसिद्ध नाव असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला लिलावात विकत घेतले. त्याच्यासाठी ३० लाख मोजले. मात्र अचानक अर्जुन तेंडुलकर याचे नाव आल्याने सगळ्यांनी तोंडात बोटे कोंबली. अर्जूनचा क्रिकेटमध्ये म्हणावा तितका चांगला परफॉर्मन्स नसताना त्यांची निवड मुंबई इंडियन्सने का केली, या प्रश्नाचे उत्तर नेटकरी शोधत आहे. हा वशिल्याचा प्रकार आहे का, असे काही नेटकरी विचारत आहेत, तर काही जण अर्जुनचे well come back असे म्हणत त्याचे पुनर्वसन केले की काय, अशी चर्चा करत आहेत. तर काही जण बाकी खेळाडू प्रतीक्षेत राहिले कारण अर्जुन आलाय, असे खोचकपणे बोलत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.