-
ऋजुता लुकतुके
मुंबईचा १७ वर्षीय तडाखेबाज सलामीवीर आयुष म्हात्रेला हंगाम मध्यावर आला असताना आयपीएलची लॉटरी लागली आहे. ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जमध्ये रिकामी झालेली जागा आयुष भरून काढणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. इतकंच नाही तर येत्या २० तारखेला मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यापूर्वीच तो चेन्नईच्या ताफ्यात दाखल होईल, अशी शक्यता आहे. ३ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचाईजीने आयुष म्हात्रेला नेट्समध्ये चाचणीसाठी बोलावलं होतं. तिथून आयुष म्हात्रेच्या समावेशाची चर्चा सुरू झाली होती. (IPL 2025, Ayush Mhatre)
(हेही वाचा – लहान मुलांच्या तस्करीवर Supreme Court ने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे)
🚨 News 🚨
CSK pick Ayush Mhatre as injury replacement for Ruturaj Gaikwad, SRH sign Smaran Ravichandran for the injured Adam Zampa
Details 🔽 | #TATAIPL | @ChennaiIPL | @SunRisers
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2025
जेद्दाह इथं झालेल्या मेगा लिलावात आयुषवर बोली लागली नव्हती. पण, मुंबईचा संघ रणजीत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला. तेव्हा बाद फेरीत आयुषने दिमाखदार शतक झळकावलं होतं. त्यातच चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला झालेल्या कोपराच्या दुखापतीनंतर चेन्नईला सलामीवीराचीच गरज आहे. ती जागा आता आयुष म्हात्रे भरून काढणार आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी आतापर्यंत हा हंगाम विसरण्यासारखा गेला आहे. ६ सामन्यांमध्ये संघ फक्त १ सामना जिंकू शकला आहे. त्यातच गायकवाडच्या दुखापतीमुळे संघाची धुरा पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी सांभाळत आहे. पण, त्यानंतरही संघाचं नशीब पालटलं नाही. (IPL 2025, Ayush Mhatre)
(हेही वाचा – Robert Vadra यांना ईडीचे पुन्हा समन्स, शिकोहपूर येथील जमिनीचे काय आहे प्रकरण?)
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चेन्नईचा संघ २० षटकांत ९ बाद १०३ धावाच करू शकला. संघ सातत्याने हरतोय आणि संघाचे पराभवही मोठे आहेत. त्यातच राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात जोफ्रा आर्चरचा चेंडू कोपरावर बसून ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली होती. त्यानंतरही त्याने फलंदाजी केली आणि त्या सामन्यात त्याने ६३ धावा केल्या. तर हात दुखत असताना आणखी दोन सामने तो खेळला. यात त्याने अनुक्रमे ५ आणि १ धाव केली. पण, दुखापत वाढून कोपराचं हाड काहीसं मोडल्याचं निदान झालं आणि त्यानंतर ऋतुराजला आता उर्वरित हंगाम खेळता येणार नाहीए. (IPL 2025, Ayush Mhatre)
तर आयुष म्हात्रे मुंबईकडून यंदा आपला पहिला रणजी हंगाम खेळला आहे आणि यात त्याने ७ सामन्यांत ६२ धावांच्या सरासरीने ४५८ धावा केल्या आहेत. तर विजय हजारे चषकातही त्याच्या नावावर ४७१ धावा आहेत. महाराष्ट्राविरुद्ध १७६ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. १७ वर्षांचा असल्यामुळे त्याच्याकडे भारताचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. (IPL 2025, Ayush Mhatre)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community