बंगळूरुने मुंबई इंडियन्सला लिहिलं पत्र! काय आहे पत्रात?

133

आयपीएलच्या पंधराव्या मोसमातील प्ले ऑफ साठीची लढत आता अधिकच रंगतदार झाली आहे. शनिवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये साखळी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात मुंबईचा विजय हा मुंबईपेक्षा बंगळूरुसाठी आता महत्वाचा झाला आहे. त्यामुळे या सामन्यासाठी बंगळूरुने मुंबईला पाठिंबा दिला असून, बंगळूरुच्या संघाने मुंबईला खास पत्र देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

बंगळूरुला मुंबईच्या विजयाची गरज

मुंबई आणि दिल्ली या दोन संघामध्ये शनिवारी आयपीएलचा साखळी सामना रंगत आहे. या सामन्यावरच बंगळूरुचं प्लेऑफ मधील भविष्य अवलंबून आहे. मुंबईने जर या सामन्यात दिल्लीला हरवलं तर बंगळूरुचं प्लेऑफमधील चौथं स्थान निश्चित होणार आहे. दिल्लीचे सध्या 13 सामन्यांत 14 पॉइंट आहेत, तर बंगळूरूचे सर्व साखळी सामने संपले असून, त्यांना 14 पॉइंटची कमाई करता आली आहे.

मुंबई इंडियन्ससाठी पत्र

त्यामुळे जर आज दिल्लीने सामना जिंकला तर दिल्ली आणि बंगळूरुचे पॉइंट्स समान होतील. पण दिल्लीचा नेट रन रेट बंगळूरूपेक्षा जास्त असल्यामुळे दिल्लीचा विजय झाल्यास त्यांचे प्लेऑफ मधले स्थान निश्चित होणार आहे. त्यामुळे बंगळूरू संघाने मुंबईला चीअर करण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक पत्र पोस्ट केलं आहे. रेड टर्न्स ब्लू असा हॅशटॅग शेअर करत बंगळूरूने मुंबईला पाठिंबा दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.