T20 World Cup : भारताच्या पराभवानंतर सचिनची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, पराभव सुद्धा…

129

टी-२० विश्वचषकात भारताचा पराभव झाल्यानंतर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंग्लंडने भारताचा १० विकेट्सने पराभव केला यामुळे टीम इंडियाचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंग झाले. तसेच भारतीय चाहते सुद्धा या पराभवानंतर अत्यंत दु:खी झाले आहेत.

जल्लोष साजरा करतो तसेच पराभव सुद्धा पचवता आला पाहिजे…

सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर सचिनने ट्विट केले आहे. जशा नाण्याला दोन बाजू असतात तसे आयुष्यात सुद्धा होते. जर आपण संघाच्या विजयाचा जल्लोष साजरा करतो तसेच पराभव सुद्धा पचवता आला पाहिजे. आयुष्यात दोन्ही गोष्टी सोबत असतात. सचिनचे हे ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. चाहत्यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

गोष्टी नियोजनाप्रमाणे घडल्या नाहीत

दरम्यान, आम्ही सुरूवातीला घाबरलो होतो, पण इंग्लंडने खूप चांगली फलंदाजी केली. चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये खूप स्विंग करत होता. परंतु तो योग्य ठिकाणी पडत नसल्याने यश मिळाले नाही. पहिल्या सामन्यात विजय मिळवून आम्ही विश्वचषकात चांगली कामगिरी केली परंतु या सामन्या गोष्टी नियोजनाप्रमाणे घडल्या नाहीत असे भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.