३ वर्षांनी शतक केल्यावर काय म्हणाला विराट कोहली? व्हिडिओ होतोय व्हायरल…

146

भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने वनडेमध्ये आपले ४४ वे आणि सगळ्या फॉरमॅटमध्ये मिळून ७२ वे शतक केले आहे. विराटने ९१ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह ११३ धावा केल्या.

( हेही वाचा : समृद्धी महामार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला १० किमी प्रवास)

क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून विराटच्या नावावर ७२ शतक झाली आहेत. सर्वाधिक शतकांच्या यादीत विराटने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉन्टिंगला मागे टाकले आहे. आता वनडेमध्ये विराटच्या पुढे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असून त्याची ४९ शतके झाली आहेत.

बांगलादेशविरुद्ध विराटने शतक झळकाल्यावर सर्वांनीच त्याचे कौतुक केले. विराटचे चाहते सुद्धा या शतकाची आतुरतेने वाट पाहत होते. त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय म्हणाला विराट?

विराट शतक केल्यावर ३ वर्ष लागली यासाठी बॉस… असे म्हणत असलेला व्हिडिओ सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. विराटने यावर्षी आशिया कपमध्ये आफगाणिस्तानविरुद्ध सुपर ४ लढतीत नाबाद १२२ धावा केल्या होत्या. विराट तीन वर्षांपूर्वी बांगलादेशविरुद्ध इडन गार्डन्स मैदानावर २२ नोव्हेंबर २०१९ रोजी शतक केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.