Virat Kohli : विराट कोहली कसोटी कर्णधार रहायला हवा होता, असं संजय बांगर यांना का वाटतं?

Virat Kohli : विराट कोहलीची कर्णधार म्हणून यशाची टक्केवारी सगळ्यात जास्त आहे.

62
Virat Kohli : विराट कोहली कसोटी कर्णधार रहायला हवा होता, असं संजय बांगर यांना का वाटतं?
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहली आजही भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. आकडेवारी असं सांगते की, तो कर्णधार असलेल्या ६० टक्क्यांहून जास्त कसोटी भारताने जिंकल्या आहेत. म्हणूनच असेल कदाचित, विराट कर्णधार असताना भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक असलेल्या संजय बांगर यांनी विराटला कसोटी कर्णधार ठेवायला हवं होतं, असं म्हटलं आहे. २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ४० कसोटी सामने जिंकले आहेत.

एका पॉडकास्टवर चर्चा करताना संजय बांगर म्हणाले, मला वैयक्तिकरित्या वाटते की विराट कोहलीने दीर्घ कालावधीसाठी कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवायला हवे होते. विराट कोहलीने ६५ पेक्षा जास्त कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे यापुढेही कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने कर्णधारपदाची भूमिका कायम ठेवायला हवी होती, असं संजय बांगर यांनी सांगितले.

(हेही वाचा – Ajit Pawar यांच्या मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच कन्येला शरद पवार गटाकडून उमेदवारी)

विराट कोहलीची मानसिकता संघाला परदेशात जास्तीत जास्त सामने जिंकण्यास मदत करण्याची होती. कारण त्यावेळी भारताने घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवले होते. भारतीय संघ घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक वेळा जिंकेल असा विश्वास होता. त्यामुळे भारताने परदेशी खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करावी अशी विराट कोहलीची इच्छा होती.

विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत ६ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी ४० वेळा संघाने विजय मिळवला. विराट कोहली हा केवळ भारताला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवून देणारा खेळाडू नाही तर त्याची विजयाची टक्केवारी एमएस धोनी आणि सौरव गांगुली यांच्यापेक्षा खूपच चांगली आहे. २०१४-१५ च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात कोहलीने पहिल्यांदा टीम इंडियाची कमान सांभाळली. त्यानंतर, कर्णधार म्हणून त्याने भारतासाठी ५४.८० च्या सरासरीने ५,८६४ धावा केल्या आहेत.

सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली १९ व्या क्रमांकावर आहे. त्याने ११३ कसोटी सामने खेळले आहेत. या ११३ सामन्यांमध्ये त्याने ५५.५६ च्या स्ट्राइक रेटने ८,८४८ धावा केल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत ३० अर्धशतके आणि २९ शतकांचा समावेश आहे. विराट कोहलीची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या म्हणजे नाबाद २५४ धावा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.