India VS Pakistan : ‘विराट’ विजयानंतर कोहलीने केले ट्वीट म्हणाला…

111

टी-२० विश्वचषकाला सुरूवात झाली असून भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानच्या पराभवाला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे मोठे योगदान आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानने दिलेल्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे सुरूवातीचे फलंदाज लवकर बाद झाले यानंतर विराट कोहलीने हार्दिक पंड्यासोबर पार्टनरशिप करत भारताना विजय मिळवून दिला.

( हेही वाचा : मुंबईतील ‘या’ ४ स्थानकांचा होणार ३६ महिन्यांत कायापालट)

या सामन्यात विराटने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी केली. भारताच्या विजयात विराटने महत्त्वाची भूमिका बजावली यानंतर संपूर्ण देशभरातून विराटचे कौतुक केले जात आहे. देशवासीयांनी कौतुक केल्यानंतर आता विराटने ट्वीट केले आहे.

विराट कोहलीने केले ट्वीट 

विराट कोहलीने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. विराट म्हणाल, एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल सर्व चाहत्यांचे आभार असे ट्वीट त्याने केले आहे. असे लिहित विराटने या सामन्या दरम्यानचे काही अविस्मरणीय फोटोही शेअर केले आहेत. कोहलीचे हे ट्वीट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले, माजी क्रिकेटक सुनील गावस्कर यांचा आनंद व्यक्त करतानाचा व्हिडिओ इरफान पठाण याने शेअर केला. हा व्हिडिओ सुद्धा सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.