शिवनेरी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे असलेल्या या किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला. इस 1595 मध्ये मालोजीराजे भोसले यांनी बहादूर निजामशाहाकडून हा किल्ला जिंकला. किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर होतं त्यावरून त्याला शिवनेरी नाव दिलं.
तोरणा किल्ला या किल्ल्याला प्रचंड गडहीम्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतल्यानंतर पहिल्यांदा जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला, जो किल्ला जिंकून महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं तोरण बांधलं.
राजगड (प्रथम राजधानी) राजगड हा किल्ला हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी होती. याच किल्ल्यावर महाराजांना छत्रपती ही पदवी देण्यात आली. हा किल्ला पुण्यापासून 60 किमीवर आहे. ज्याचे नाव अगोदर रायरी असं होतं.
रायगड (मुख्य राजधानी) रायगड हा महाराजांनी प्रचंड विस्तार केलेल्या मराठा साम्राज्याची राजधानी होती. हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगेमध्ये रायगड जिल्ह्यातील महाडपासून 25 किमीवर आहे. महाराजांच्या कारकिर्दीत हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार ठरला.
सिंहगड पुण्याजवळील सिंहगड म्हणजेच पूर्वीचा कोंढाणा किल्ला. याचा इतिहास अत्यंत ज्वलंत आणि युद्धाचा आहे. तानाजी मालुसरे आणि त्यांच्या भावाने हा किल्ला जिंकला. यात ते धारातिर्थी पडले. याच प्रसंगामुळे गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाल्याने किल्ल्याला नाव सिंहगड देण्यात आलं.
प्रतापगड प्रतापगड महाराजांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय स्थळ आहे. येथे 1659 रोजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. महाबळेश्वरपासून अवघ्या 24 किमीवर हा किल्ला आहे. या किल्ल्याची खासियत म्हणजे इतर किल्ल्यांपेक्षा सर्वात मजबूत तटबंदी या किल्ल्याला असून वायव्यकडे तर 800 फुटाहून अधिक उंच अशी तटबंदी बांधलेली आहे.
पन्हाळा महाराजांनी 500 पेक्षा जास्त दिवस या किल्ल्यावर घालवले. बाजीप्रभू देशपांडे धारार्थी पडलेल्या पावनखिंडच्या लढाईत हा किल्ला केंद्रस्थानी होता. त्यानंतर कोल्हापूर संस्थांच्या संस्थापक राणी ताराबाई या किल्ल्यावर होत्या. या किल्ल्याने अनेक उलथापालथी पाहिल्या. संरक्षणाच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा डोंगरी किल्ल्यांपैकी एक आहे.
विशाळगड ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला हा किल्ला 1659 मध्ये महाराजांनी जिंकला. अत्यंत अवाढव्या असल्याने त्याला विशाळगड नाव देण्यात आले. पन्हाळगडाला सिद्धी जौहरने टाकलेल्या वेढ्यातून महाराज सुटका करून विशाळगडावर पोहोचले. कोल्हापूर पासून वायव्येस 76 किलोमीटर अंतरावर हा किल्ला वसलेला आहे.