संजय राऊत महागद्दार, हिंमत असेल तर राजीनामा द्यावा; मंत्री शंभूराज देसाईंचा विधानसभेत घणाघात

113

भाकरी खातात मातोश्रीची, चाकरी करतात शरद पवारांची, असे म्हणत कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी विधानसभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. दादा भुसेंनी हे विधान करताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार कडाडले आणि शरद पवारांचा उल्लेख केल्याबद्दल भुसेंनी माफी मागावी, अशी मागणी अजित पवारांनी केली. या विधानावरून विधानसभेत गदारोळ झाला. यादरम्यान कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी दादा भुसेंची पाठराखण करत संजय राऊतांना महागद्दार म्हणून त्यांच्यात हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक यावे, असे आव्हान राऊतांना दिले.

नक्की विधानसभेत काय म्हणाले शंभुराज देसाई?

शंभूराज देसाई म्हणाले की, ‘आमचे सहकारी, मंत्री दादा भुसे यांनी एका संस्थेच्या अनुषंगाने जे त्यांच्यासंदर्भातले स्पष्टीकरण होत, ते देत असताना या ठिकाणी काही गोष्टी घडल्या. आदरणीय शरद पवारांबाबत महाराष्ट्रालाच नाहीतर संपूर्ण देशाला त्यांचा आदर आहे. राज्याच नेतृत्व शरद पवारांनी देशात केले आणि कृषीमंत्री म्हणून शरद पवारांनी जे काही निर्णय राज्याच्या हिताचे घेतले, ते आम्हाला सगळ्यांना माहितेय आहे. विशेषतः साखर उद्योगामध्ये शरद पवारांचे योगदान सगळ्या देशाने पाहिले. पण अध्यक्ष महोदय, दादा भुसे जे काही बोलले, ते संजय राऊत, ज्यांनी दादा भुसे असतील किंवा आम्ही असू ते आमच्या मतावर निवडून आले.’

आम्हाला डुक्कर, आम्हाला गटातले पाणी….

यादरम्यान शंभूराज देसाई बोलत असताना सभागृहात विरोधकांनी एकच गोंधळ घालत होते. यावेळी देसाई विरोधकांना म्हणाले, ऐकू घ्या, ते आमच्या मतावर निवडून आलेत. आम्ही या सभागृहाचे सदस्य आहोत. आम्हाला डुक्कर, आम्हाला गटातले पाणी, प्रेत म्हणतात. हे तुम्हाला बोललेल चालेल का? शरद पवारांबाबत जे काही दादा भुसे म्हणाले आहेत. ते अध्यक्षांनी तपासून घ्यावे, पवारांबद्दल अनुउद्दगार दादा भुसेंनी काढलेले नाहीत. पण आमच्याबद्दल कोणीही काहीही बोलेल हे आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे हा जो महागद्दार आहे, जो आमच्या मतावर निवडून आलाय, त्याला निश्चितपणे आमच्याबद्दल अशाप्रकारे वक्तव्य करण्याचा अधिकार नाही. पवारांबद्दल आम्हाला आदर आहे. पवारांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही. जे आमच्या चाळीस मतावर निवडून आलेत, त्यांनी पहिला राजीनामा द्यावा, त्यांच्यात हिंमत असेल तर परत निवडून यावे. आणि मग आमच्याबद्दल बोलावे, असे शंभुराज देसाई म्हणाले.

(हेही वाचा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा धमकींचा फोन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.